शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

गहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनीही घेतली राज्यपालांची भेट; निकालांआधी हालचाली वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 09:52 IST

Rajasthan Assembly Election: राजस्थानमधील बहुतांश एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्याचे दिसून आले आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्याआधीच राज्यात राजकीय पेच वाढला आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. राजस्थानच्या राजकारणातील या दोन दिग्गजांच्या राज्यपालांशी झालेल्या भेटीवरून राजकीय परिणाम काढले जात आहेत. 

राजस्थानमधील बहुतांश एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्याचे दिसून आले आहे. पण इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया आणि टुडे चाणक्य यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरश होण्याची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही एजन्सीनुसार राज्यात काँग्रेसची थोडीशी आघाडी आहे. अॅक्सिस माय इंडियाने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ८० ते १०० जागा आणि काँग्रेसला ८६ ते १०६ जागा दिल्या आहेत. 

'पोल ऑफ पोल'मध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता-

जर आपण 'पोल ऑफ पोल्स' (सर्व एजन्सीच्या एक्झिट पोलची सरासरी) बद्दल बोललो तर राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार बनत आहे आणि भाजपाला ११० ते ११६ जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या निकालात एवढी चुरशीची लढत पाहून भाजपा आणि काँग्रेसने अपक्ष उमेदवार आणि इतर छोट्या पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने अधिकृतपणे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री चेहरा म्हणून कोणालाही घोषित केलेले नाही. पण वसुंधरा राजे यांच्या कार्यकर्तृत्वाचा अर्थ असा काढला जात आहे की, राजस्थानमधील निकाल भाजपाला अनुकूल झाल्यास केंद्रीय नेतृत्वाकडून पुन्हा एकदा त्यांच्याकडे राज्याची कमान सोपवली जाऊ शकते.

निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी वसुंधरा आणि गहलोत सक्रिय 

त्याचवेळी अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असल्याने या निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा होता. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान पक्षाने होर्डिंग्ज आणि बॅनरवर गेहलोत यांची छायाचित्रे ठळकपणे प्रसिद्ध केली होती. अशा स्थितीत निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यास अशोक गहलोत यांचा मान आणखी वाढेल. कारण राज्यात अनेक दशकांत पहिल्यांदाच पुनरावृत्तीचे सरकार येणार आहे. अशा स्थितीत अशोक गहलोत यांच्या 'जादूगार' प्रतिमेला आणखी बळ मिळणार आहे. जर पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा काही कमी होण्यावर थांबला आणि भाजप जादूई आकड्याला स्पर्श करू शकला नाही, तर अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे आपापल्या पक्षांसाठी अडचणीत सापडतील.

दोघांचाही सध्या राज्याच्या राजकारणात मोठा मान-

सरकार स्थापनेसाठी ५-१० आमदारांचा पाठिंबा हवा असेल, तर काँग्रेससाठी अशोक गहलोत आणि भाजपसाठी वसुंधरा राजे हे समीकरण सोडवण्यासाठी सर्वात योग्य नेते असतील यात शंका नाही. या दोघांचाही सध्या राज्याच्या राजकारणात मोठा मान आहे. अशा परिस्थितीत, या दोघांची राज्यपालांसोबतची बैठक हे सूचित करते की कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षांनी त्यांच्यावर सोपवली आहे. वास्तविक, काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. पण क्रायसिस मॅनेजमेंटच्या बाबतीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्या उंचीचे दुसरे कोणी नाही. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत