शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

“निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:26 IST

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rajasthan Assembly Election 2023: २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री राजस्थानात प्रचार करत आहेत. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप यांच्यात काँटे की टक्कर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. एकदा विधानसभा निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसतीलच असे नाही, या शब्दांत गेहलोत यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका प्रचारसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्यानंतर पाच वर्षे राजस्थानमध्ये येणार, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हमी देऊ शकतील का, अशी विचारणा अशोक गेहलोत यांनी केली. यावेळी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, याचा पुनरुच्चार अशोक गेहलोत यांनी केला. राजस्थानमध्ये पुन्हा जादू चालेल. राजस्थानच्या सर्व जागांवर मीच निवडणूक लढवत आहे, असाच विचार जनतेने करावा आणि राज्याच्या हितासाठी काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे 

राजस्थानात लाल डायरीवरून राजकीय वातावरण तापले होते. पंतप्रधान मोदी यांनीही लाल डायरीचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली होती. यावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे आहे. जर आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर सदर लाल डायरी ही ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआयकडे सोपवावी, असे आव्हान गेहलोत यांनी दिले. कन्हैया लाल हत्या प्रकरणातील आरोपींना आतापर्यंत फाशी द्यायला हवी होती, परंतु एनआयएचा तपास ज्या प्रकारे व्हायला हवा होता, त्या पद्धतीने होत नाही, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला होता.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा