शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

“निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:26 IST

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rajasthan Assembly Election 2023: २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री राजस्थानात प्रचार करत आहेत. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप यांच्यात काँटे की टक्कर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. एकदा विधानसभा निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसतीलच असे नाही, या शब्दांत गेहलोत यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका प्रचारसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्यानंतर पाच वर्षे राजस्थानमध्ये येणार, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हमी देऊ शकतील का, अशी विचारणा अशोक गेहलोत यांनी केली. यावेळी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, याचा पुनरुच्चार अशोक गेहलोत यांनी केला. राजस्थानमध्ये पुन्हा जादू चालेल. राजस्थानच्या सर्व जागांवर मीच निवडणूक लढवत आहे, असाच विचार जनतेने करावा आणि राज्याच्या हितासाठी काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे 

राजस्थानात लाल डायरीवरून राजकीय वातावरण तापले होते. पंतप्रधान मोदी यांनीही लाल डायरीचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली होती. यावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे आहे. जर आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर सदर लाल डायरी ही ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआयकडे सोपवावी, असे आव्हान गेहलोत यांनी दिले. कन्हैया लाल हत्या प्रकरणातील आरोपींना आतापर्यंत फाशी द्यायला हवी होती, परंतु एनआयएचा तपास ज्या प्रकारे व्हायला हवा होता, त्या पद्धतीने होत नाही, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला होता.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा