शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

“निवडणूक झाल्यावर PM मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसणार नाहीत”; अशोक गेहलोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:26 IST

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rajasthan Assembly Election 2023: २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री राजस्थानात प्रचार करत आहेत. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप यांच्यात काँटे की टक्कर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. एकदा विधानसभा निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसतीलच असे नाही, या शब्दांत गेहलोत यांनी निशाणा साधला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका प्रचारसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्यानंतर पाच वर्षे राजस्थानमध्ये येणार, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हमी देऊ शकतील का, अशी विचारणा अशोक गेहलोत यांनी केली. यावेळी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, याचा पुनरुच्चार अशोक गेहलोत यांनी केला. राजस्थानमध्ये पुन्हा जादू चालेल. राजस्थानच्या सर्व जागांवर मीच निवडणूक लढवत आहे, असाच विचार जनतेने करावा आणि राज्याच्या हितासाठी काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.

लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे 

राजस्थानात लाल डायरीवरून राजकीय वातावरण तापले होते. पंतप्रधान मोदी यांनीही लाल डायरीचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली होती. यावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे आहे. जर आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर सदर लाल डायरी ही ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआयकडे सोपवावी, असे आव्हान गेहलोत यांनी दिले. कन्हैया लाल हत्या प्रकरणातील आरोपींना आतापर्यंत फाशी द्यायला हवी होती, परंतु एनआयएचा तपास ज्या प्रकारे व्हायला हवा होता, त्या पद्धतीने होत नाही, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला होता.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा