शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

“निवडणुकीत भाजपचा साधा मागमूसही नाही, ED अन् काँग्रेसमध्येच थेट मुकाबला”: अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 11:43 IST

Rajasthan Assembly Election 2023: ईडीच्या आडून लढण्यापेक्षा थेट सामोरे येऊन आमच्याशी लढून दाखवा, असे खुले आव्हान अशोक गेहलोत यांनी ईडीला दिले.

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. काँग्रेस सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून, भाजप पुनरागमन करण्यास मोठ्या प्रमाणात इच्छूक आहे. राजस्थानमधील जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवायांवरून पुन्हा एकदा टीका केली आहे. या निवडणुकीत भाजप कुठेच दिसत नाही. राजस्थानमधील निवडणूक ईडी विरोधात काँग्रेस अशीच आहे, असा खोचक टोला अशोक गेहलोत यांनी लगावला.

काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक गेहलोत यांच्या पुत्राला नोटीस बजावली होती आणि चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच काँग्रेस नेत्यांच्या घरी छापेमारी केली होती. भीलवाडा येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ईडीच्या छापेमारीवरून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध ईडी अशी लढत आहे. ईडी राजस्थान राज्याच्या हात धुवून मागे लागली आहे. मला दोनदा दिल्लीला बोलावण्यात आले. माझ्या मुलाला दिल्लीला बोलावले आहे. कोणतीही केस नाही, एफआयआर नाही, तक्रार नाही. तक्रार करणारे भाजपचे आहेत, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 

निवडणुकीत भाजप कुठेही दिसत नाही

या निवडणुकीत भाजप कुठेही दिसत नाही. इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांनी आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी. विजय मल्ल्याप्रमाणेच लंडनमध्ये बसलेले नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी अनेक वर्षांपासून फरार आहेत. तुम्ही सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर करत आहात. निवडून आलेली सरकारे पडली तर लोकशाहीचे काय होईल? ही पद्धत नाही. ईडीच्या माध्यमातून आमच्याशी लढत आहेत. हिंमत असेल तर थेट स्पर्धा करा, असे आव्हान अशोक गेहलोत यांनी भाजपला दिले. मुलगा वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावत हजर राहण्याचे निर्देश दिले, त्यावेळीही अशोक गेहलोत यांनी निशाणा साधला होता. देशभरात ईडीने दहशत माजवली आहे. प्रश्न केवळ राजस्थान प्रदेशाध्यक्षांवर छापेमारी किंवा माझ्या मुलाला नोटीस बजावल्याचा नाही. छत्तीसगडमध्ये तर अनेक कुटुंबांनी ईडीच्या भीतीने स्थलांतर केले आहे, असे दावा अशोक गेहलोत यांनी केला होता.

दरम्यान, देशभरातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता त्यात बदल करून २५ नोव्हेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ०३ डिसेंबरला लागणार आहे.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेस