शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 05:30 IST

आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.

जयपूर : राजस्थान सरकारने कारागृह तसेच वनखात्यातील रक्षक, राज्य पोलिसांच्या भरतीत माजी अग्निवीरांना राखीव जागा ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केली. पण, या जागांचे प्रमाण किती असेल ते त्यांनी जाहीर केले नाही. तर अरुणाचल प्रदेशमधील पोलिस, अग्निशमन दलाच्या भरतीत माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. 

राज्य पोलिस, आपत्कालीन संकट निवारण व अग्निशमन दल, अरुणाचल प्रदेश बटालियन्समधील भरतीमध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटले आहे. 

सत्तेवर आल्यानंतर अग्निपथ योजना रद्द करू : अखिलेश यादव

आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. यूपीमध्ये पोलिस व प्रॉव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टॅब्युलरीतील (पीएसी) भरतीमध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यावर यादव यांनी टीका केली आहे. ‘अग्निवीर’मुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे, असेही ते म्हणाले. 

राखीव जागांची घाेषणा

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, राज्यातील पोलिस तसेच कारागृह, वनखात्यातील रक्षकांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी अग्निपथ योजना उत्तम असल्याचे सांगितले. लष्कराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही योजना उपयोगी असल्याचे ते म्हणाले. पोलिस व अन्य राज्यातील अन्य दलांमध्ये माजी अग्निवीरांना आरक्षण ठेवण्याची घोषणा मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, यूपी, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांनी केली होती. 

 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाRajasthanराजस्थानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश