शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi Rajasthan Visit: नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; राजस्थानमधून पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:41 IST

PM Modi Rajasthan Visit: नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत.

राजसमंद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(बुधवारी) राजस्थानच्या एक दिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पीएम मोदी दामोदर स्टेडियमवर पोहोचले आणि 5500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. राजस्थान हे भारताच्या शौर्याचे, वारशाचे आणि संस्कृतीचे वाहक आहे आणि राजस्थानचा जितका विकास होईल तितका भारताच्या विकासाला गती येईल, असे मोदी यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यात रस्ते, रेल्वे, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सुविधांचा समावेश असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत असल्याचे ते म्हणाले. राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासाच्या मंत्रावर आमच्या सरकारचा विश्वास असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच श्रीनाथजी मंदिरात पोहोचले होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सरकारला राजस्थानच्या विकासामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकांचे जीवन सुसह्य करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आज देशात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे, सर्व कामे अभूतपूर्व गतीने होत आहेत आणि आमचे सरकार रेल्वे, महामार्ग, विमानतळ अशा प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने काम करत आहे.

'नकारात्मक विचारा असलेल्यांना विकास नकोय'यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशातील काही लोक इतके नकारात्मकतेने भरलेले आहेत की, त्यांना देशात काहीही चांगले घडलेले आवडत नाही. शाश्वत विकासासाठी मूलभूत व्यवस्थेसोबत आधुनिकतेचा समावेश करणे आवश्यक आहे. जे लोक प्रत्येक गोष्ट मतांच्या तराजूने तोलतात, ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन कल्याणकारी योजना करू शकत नाहीत. या नकारात्मक विचारसरणीमुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले गेले नाही. 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जर आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालये आधीच सुरू झाली असती तर डॉक्टरांची कमतरता भासली नसती, रेल्वे मार्गांचे आधीच विद्युतीकरण झाले असते तर आज हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले नसते, जर आधी पाणी आले असते, तर आज जल जीवन मिशन सुरू करण्याची गरज नाही. नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस