शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

PM Modi Rajasthan Visit: नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; राजस्थानमधून पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:41 IST

PM Modi Rajasthan Visit: नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत.

राजसमंद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(बुधवारी) राजस्थानच्या एक दिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पीएम मोदी दामोदर स्टेडियमवर पोहोचले आणि 5500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. राजस्थान हे भारताच्या शौर्याचे, वारशाचे आणि संस्कृतीचे वाहक आहे आणि राजस्थानचा जितका विकास होईल तितका भारताच्या विकासाला गती येईल, असे मोदी यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यात रस्ते, रेल्वे, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सुविधांचा समावेश असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत असल्याचे ते म्हणाले. राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासाच्या मंत्रावर आमच्या सरकारचा विश्वास असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच श्रीनाथजी मंदिरात पोहोचले होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सरकारला राजस्थानच्या विकासामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकांचे जीवन सुसह्य करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आज देशात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे, सर्व कामे अभूतपूर्व गतीने होत आहेत आणि आमचे सरकार रेल्वे, महामार्ग, विमानतळ अशा प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने काम करत आहे.

'नकारात्मक विचारा असलेल्यांना विकास नकोय'यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशातील काही लोक इतके नकारात्मकतेने भरलेले आहेत की, त्यांना देशात काहीही चांगले घडलेले आवडत नाही. शाश्वत विकासासाठी मूलभूत व्यवस्थेसोबत आधुनिकतेचा समावेश करणे आवश्यक आहे. जे लोक प्रत्येक गोष्ट मतांच्या तराजूने तोलतात, ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन कल्याणकारी योजना करू शकत नाहीत. या नकारात्मक विचारसरणीमुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले गेले नाही. 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, जर आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालये आधीच सुरू झाली असती तर डॉक्टरांची कमतरता भासली नसती, रेल्वे मार्गांचे आधीच विद्युतीकरण झाले असते तर आज हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले नसते, जर आधी पाणी आले असते, तर आज जल जीवन मिशन सुरू करण्याची गरज नाही. नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस