शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:13 IST

'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.'

अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी (31 मे) राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते अनेक शहरांमध्ये रॅली काढून आपल्या कामाची माहिती देत आहेत. मोदींनी राजस्थानमधील पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात दर्शन घेऊन सभांना सुरुवात केली. यानंतर अजमेर येथील रॅलीतून काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अजमेरमधील रॅलीदरम्यान राजस्थान भाजपचे प्रमुख सीपी जोशी यांनी पगडी घालून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात देवी अहिल्याबाई होळकर यांनाही आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या 9 वर्षातील कामांची माहिती देताना विरोधकांवरही हल्लाबोल केला. 2014 पूर्वीची देशातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये रोज हल्ले व्हायचे, महिलांवर अत्याचार व्हायचे. पंतप्रधानांवर वेगळे राज्यकर्ते होते. पूर्वी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, धोरणेही ढिसाळ होती, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

एका मताने किती बदल झाले?पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2014 मध्ये जनतेच्या एका मताने विकासाचा निर्णय घेतला गेला. त्याचाच परिणाम म्हणजे आज जगभरात भारताचे कौतुक होत आहे. आज जगातील नामवंत तज्ज्ञ सांगत आहेत की, आज भारत गरिबी संपवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हा बदल एका मताने आला आहे. 50 वर्षांपूर्वी काँग्रेसने देशातील गरिबी हटवण्याची हमी दिली होती. गरिबांशी काँग्रेसचा हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. हमी देणे ही या पक्षाची जुनी सवय आहे. गरिबांना फसवायचे, गरिबांसाठी नुसती तळमळ दाखवायची हे काँग्रेसचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मोदींकडे पैसा कुठून येतो?केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप सरकारची ही 9 वर्षे देशवासीयांच्या सेवेसाठी, सुशासनासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. आज विरोधक प्रश्न विचारतात की मोदींकडे पैसा कुठून येतो. आपल्या देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. सर्व पैसा विकासात खर्च करणे आवश्यक आहे. पण यापूर्वी काँग्रेसने अशी भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली होती जी देशाला पोकळ बनवत होती.

85 टक्के कमिशनसह काँग्रेसआपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी राजीव गांधींच्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, जर सरकार 1 रुपया पाठवला तर नागरिकांपर्यंत पोहचत नव्हता. 85 टक्के कमिशन घेण्याची काँग्रेसची सवय जुनी आहे. गेल्या 9 वर्षात भाजप सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वेवर सुमारे 24 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पण इथे काँग्रेस असती तर मधेच तो पैसा लुटला गेला असता. लुटमारीचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेस कोणाशीही भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची लूट केली. त्यांच्यासाठी गरीब, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, अपंग सर्व समान आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस