शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:13 IST

'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.'

अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी (31 मे) राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते अनेक शहरांमध्ये रॅली काढून आपल्या कामाची माहिती देत आहेत. मोदींनी राजस्थानमधील पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात दर्शन घेऊन सभांना सुरुवात केली. यानंतर अजमेर येथील रॅलीतून काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अजमेरमधील रॅलीदरम्यान राजस्थान भाजपचे प्रमुख सीपी जोशी यांनी पगडी घालून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात देवी अहिल्याबाई होळकर यांनाही आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या 9 वर्षातील कामांची माहिती देताना विरोधकांवरही हल्लाबोल केला. 2014 पूर्वीची देशातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये रोज हल्ले व्हायचे, महिलांवर अत्याचार व्हायचे. पंतप्रधानांवर वेगळे राज्यकर्ते होते. पूर्वी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, धोरणेही ढिसाळ होती, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

एका मताने किती बदल झाले?पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2014 मध्ये जनतेच्या एका मताने विकासाचा निर्णय घेतला गेला. त्याचाच परिणाम म्हणजे आज जगभरात भारताचे कौतुक होत आहे. आज जगातील नामवंत तज्ज्ञ सांगत आहेत की, आज भारत गरिबी संपवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हा बदल एका मताने आला आहे. 50 वर्षांपूर्वी काँग्रेसने देशातील गरिबी हटवण्याची हमी दिली होती. गरिबांशी काँग्रेसचा हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. हमी देणे ही या पक्षाची जुनी सवय आहे. गरिबांना फसवायचे, गरिबांसाठी नुसती तळमळ दाखवायची हे काँग्रेसचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मोदींकडे पैसा कुठून येतो?केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप सरकारची ही 9 वर्षे देशवासीयांच्या सेवेसाठी, सुशासनासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. आज विरोधक प्रश्न विचारतात की मोदींकडे पैसा कुठून येतो. आपल्या देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. सर्व पैसा विकासात खर्च करणे आवश्यक आहे. पण यापूर्वी काँग्रेसने अशी भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली होती जी देशाला पोकळ बनवत होती.

85 टक्के कमिशनसह काँग्रेसआपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी राजीव गांधींच्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, जर सरकार 1 रुपया पाठवला तर नागरिकांपर्यंत पोहचत नव्हता. 85 टक्के कमिशन घेण्याची काँग्रेसची सवय जुनी आहे. गेल्या 9 वर्षात भाजप सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वेवर सुमारे 24 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पण इथे काँग्रेस असती तर मधेच तो पैसा लुटला गेला असता. लुटमारीचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेस कोणाशीही भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची लूट केली. त्यांच्यासाठी गरीब, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, अपंग सर्व समान आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस