शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

“काँग्रेसलाच अनुकूल वातावरण, लोकसभेचा निकाल अवाक् करणारा असेल”: अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:18 IST

Rajasthan Lok Sabha Election 2024: काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, २ कोटी नोकऱ्या ही २०१४ ला दिलेली आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. त्यावर आधी बोला, मग २०४७ वर विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली.

Rajasthan Lok Sabha Election 2024: गेल्या सलग दोनवेळा भाजपाने राजस्थानमध्ये सर्व २५ जागा जिंकल्या आहेत. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. आताचे वातावरण काँग्रेससाठीच अनुकूल आहे. काँग्रेसच्या किती जागा येतील, याबाबत सांगू शकत नाही. परंतु, राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल अवाक् करणारे असतील, असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. 

राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस असो किंवा भाजपा असो, दोन्ही पक्षाचे स्टार प्रचारक प्रचार कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय पक्षांसोबत स्थानिक पक्षांचाही प्रचार, बैठका घेण्यावर भर दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या जाहीरनाम्यावर टीका करताना दिसत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल काँग्रेसकडे असल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेसच्या ५ न्याय आणि २५ गॅरंटीवर भाजपा कधी बोलणार नाही

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे, राम मंदिर या मुद्द्यांवर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, हे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. मात्र, महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचा आहे. भाजपावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलावे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेले आहेत. पण भाजपा कधी त्यावर बोलणार नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव आहे, असा आरोप करताना त्यांना नेमके काय म्हणायचे, असा सवाल अशोक गेहलोत यांनी केला. 

२०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

भाजपाचा संपूर्ण जाहीरनामा वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलू शकत नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार होते, तेव्हा अनेक आश्वासने दिली होती. आम्ही काळा पैसा आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, या गोष्टींचे उत्तर पंतप्रधान मोदींनी आजपर्यंत दिलेले नाही. त्या मुद्द्यांवर चर्चाही होत नाही. जनतेला त्यांचे उत्तर हवे आहे. त्यानंतर २०४७ बाबत विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली. 

दरम्यान, भाजपावाल्यांनी जुनी आश्वासने पूर्ण केली नाहीत. असे असतानाही पुढील २५ वर्षांची चर्चा सुरू केली आहे. या गोष्टीत काही दम नाही. राहुल गांधींच्या दोन यात्रांना मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे काँग्रेसने प्रयत्न केले आहेत. जनभावनांवर आधारित जाहीरनामा तयार करण्यात आला असून, त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी सांगण्यासारखे खूप आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोषणा जुन्याच आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये २५ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १२ जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजी १३ जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी आहे. 

टॅग्स :rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत