शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

“काँग्रेसलाच अनुकूल वातावरण, लोकसभेचा निकाल अवाक् करणारा असेल”: अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:18 IST

Rajasthan Lok Sabha Election 2024: काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, २ कोटी नोकऱ्या ही २०१४ ला दिलेली आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. त्यावर आधी बोला, मग २०४७ वर विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली.

Rajasthan Lok Sabha Election 2024: गेल्या सलग दोनवेळा भाजपाने राजस्थानमध्ये सर्व २५ जागा जिंकल्या आहेत. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. आताचे वातावरण काँग्रेससाठीच अनुकूल आहे. काँग्रेसच्या किती जागा येतील, याबाबत सांगू शकत नाही. परंतु, राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल अवाक् करणारे असतील, असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. 

राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस असो किंवा भाजपा असो, दोन्ही पक्षाचे स्टार प्रचारक प्रचार कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय पक्षांसोबत स्थानिक पक्षांचाही प्रचार, बैठका घेण्यावर भर दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या जाहीरनाम्यावर टीका करताना दिसत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल काँग्रेसकडे असल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेसच्या ५ न्याय आणि २५ गॅरंटीवर भाजपा कधी बोलणार नाही

जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे, राम मंदिर या मुद्द्यांवर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, हे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. मात्र, महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचा आहे. भाजपावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलावे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेले आहेत. पण भाजपा कधी त्यावर बोलणार नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव आहे, असा आरोप करताना त्यांना नेमके काय म्हणायचे, असा सवाल अशोक गेहलोत यांनी केला. 

२०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?

भाजपाचा संपूर्ण जाहीरनामा वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलू शकत नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार होते, तेव्हा अनेक आश्वासने दिली होती. आम्ही काळा पैसा आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, या गोष्टींचे उत्तर पंतप्रधान मोदींनी आजपर्यंत दिलेले नाही. त्या मुद्द्यांवर चर्चाही होत नाही. जनतेला त्यांचे उत्तर हवे आहे. त्यानंतर २०४७ बाबत विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली. 

दरम्यान, भाजपावाल्यांनी जुनी आश्वासने पूर्ण केली नाहीत. असे असतानाही पुढील २५ वर्षांची चर्चा सुरू केली आहे. या गोष्टीत काही दम नाही. राहुल गांधींच्या दोन यात्रांना मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे काँग्रेसने प्रयत्न केले आहेत. जनभावनांवर आधारित जाहीरनामा तयार करण्यात आला असून, त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी सांगण्यासारखे खूप आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोषणा जुन्याच आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये २५ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १२ जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजी १३ जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी आहे. 

टॅग्स :rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत