शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:23 IST

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं.

देशातील ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला दैदिप्यमान यश मिळालं. त्यामुळे, ५ पैकी ३ राज्यात भाजपाने सरकार स्थापन केलं आहे. मात्र, तिन्ही राज्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठी धक्कातंत्र वापरलं. विशेष म्हणजे राजस्थानमध्येमुख्यमंत्री कोण होणार, यावर मोठं मंथन झालं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नावे पुढे येत होती. त्यापैकी, एक नाव म्हणजे महंत बालकनाथ. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही त्यांची तुलना झाली. पण, भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. 

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांनीच काढलेल्या चिठ्ठीत भजनलाल शर्मा याचं नाव पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. राजस्थानसह देशभरात भाजपाने हा मास्टरस्ट्रोक खेळला होता. त्यानंतर, राजस्थानच्या भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातही बालकनाथ यांना स्थान मिळालं नाही. ज्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं. वसुंधराराजे यांच्याशी ज्यांची स्पर्धा समजली जात होती. त्या, बालकनाथ यांना साधे मंत्रिमंडळातही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

भाजपाने राजस्थान विधानसभा निवडणुकीत महाराणी दीया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड, देवजी पटेल, नरेंद्र खीचड, भगीरथ चौधरी आणि बाबा बालकनाथ यांच्यासह एकूण ७ खासदारांना मैदानात उतरवले होते. हरियाणाच्या रोहतक येथील बाबा मस्तनाथ पीठाचे महंत बालकनाथ योगी हेही तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. बाबा बालकनाथ हेही त्याच संप्रदायातून येतात, जेथून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या एक्झिट पोलमध्ये बाबा बालकनाथ यांचं नाव दुसऱ्या स्थानावर होतं. मात्र, भजनलाल शर्मा यांच्या कॅबिनेटमध्ये बाबा बालकनाथ यांना स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. 

जातनिहाय गणितांसह संत समाजातील मतांच्या टक्केवारीच्या गणितामुळेच बाबा बालकनाथ यांना स्थान मिळाले नसावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बालकनाथ यांचे मंत्रिमंडळातील स्थान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरील फोकस कमी करणारे ठरले असते, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तसेच, संत बालकनाथ यांच्यासह संत परंपरेतील आणखी दोन आमदार आहेत. त्यामुळे, पुढे त्यांनाही मंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवावे लागले असते. म्हणून भाजपाने बाबा बालकनाथ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानChief Ministerमुख्यमंत्रीElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथ