शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

CM एकनाथ शिंदेंकडून राजस्थानात करेक्ट कार्यक्रम; काँग्रेसला खिंडार, बडा नेता शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:37 IST

CM Eknath Shinde In Rajasthan: माजी मंत्री असलेल्या काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

CM Eknath Shinde In Rajasthan: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. केवळ ठाकरे गटातील नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राजस्थानात जाऊन काँग्रेसला खिंडार पाडले. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानात जाऊन काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला. राजस्थानात काँग्रेसची सत्ता असून, तेथील एका बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदे स्वतः राजस्थानात गेले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.

काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत घेतले. इथेही उद्योगधंदे येतील. रोजगार मिळतील अशी आशा आहे. मी तुमचा हात धरला आहे. इथे बाण चालेल. जोरदार चालेल. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापाच्या विचाराने आपण काम करू. या राज्यात शिवसेना पसरवू. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले आहे. तुमचे स्वागत आणि अभिनंदन आहे, असे राजेंद्र गुढा यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, राजेंद्र गुढा यांचे शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचे नाव गाजले आहे. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता हा होय. आता या गुणाचे मिलन झाले. तुम्ही मंत्रीपद सोडले. पण सत्य सोडले नाहीत, यासाठी तुमचे कौतूक. तुम्ही जसे मंत्रीपद त्यागले, तसेच मी सत्ता सोडली. मंत्रीपद सोडले आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्येचा त्याग केला, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाRajasthanराजस्थान