शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

झेनिथ कं पनीची वसाहत ४२ दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 1:11 AM

कामगारांची गैरसोय : विजेची मागणी

कर्जत : खालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ कंपनीच्या वसाहतीतील वीजपुरवठा गेल्या ४२ दिवसांपासून बंद आहे, तो त्वरित सुरू करावा, अशी मागणी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. झेनिथ बिर्ला इंडिया हा कारखाना १२ डिसेंबर २०१३ पासून मालकांनी बेकायदा बंद केला आहे. कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये एकूण ७२ कामगार कु टुंबांसह राहत आहेत. बंदच्या काळात कंपनीने वीजबिल न भरल्यामुळे चार ते पाच वेळा वसाहतींमध्ये राहणाºया कामगारांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. ७ जानेवारी २०२० पासून कंपनीच्या व्यवस्थापनाने वीजबिल न भरल्यामुळे वसाहतीच्या इमारतींमधील कामगारांवर काळोखात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत कर्मचाºयांनी संबंधित सर्वांशी पत्रव्यवहार करूनही आमची कोणीही दखल घेत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

१३ फेब्रुवारी २०२० रोजी कामगार ठाणे येथील न्यायालयात गेले असता व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी न्यायालयात हमीपत्र दिले आहे. यामध्ये आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही टप्प्याटप्प्याने रक्कम भरू. त्याप्रमाणे व्यवस्थापनाने १ लाख १९ हजार ही रक्कम १४ फेब्रुवारीला भरली आहे. न्यायालयात सादर केलेले हमीपत्र व काही रक्कम भरल्याची पावती वीज वितरण कंपनीचे पेण येथील अभियंता दीपक पाटील यांना दिली आहे, तरीसुद्धा वीजपुरवठा चालू करत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत कामगारांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वीज व पाणीपुरवठा नियमित ठेवावा, असे आदेश न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. तरीही कामगारांना अंधारात राहावे लागत आहे.परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची अडचणकंपनीच्या वसाहतीमध्ये वृद्ध, अपंग, नवजात बालक राहात आहेत. तसेच सध्या बारावीची परीक्षा सुरूआहे, पुढच्या महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. याच कालावधीमध्ये वसाहतीमधील वीजपुरवठा खंडित केल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत अभियंता पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करावा, अशी विनंती केली असता सर्व वीजबिल भरा तरच तुमची लाईट चालू केली जाईल, असे सांगितले. शेवटची रक्कम ३१ मार्च रोजी भरू तोपर्यंत आम्हाला अंधारातच ठेवणार आहेत का, असे कामगारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raigadरायगड