शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:08 IST

श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. घरांचे कौले व पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. श्रीवर्धनमध्ये शनिवारी सायंकाळपासूनच पावसाने थैमान घातले आहे. रात्रभर तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. तालुक्यातील जीवना बंदर भागात अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घरांचे पत्रे, कौले उडाल्याने नागरिकांना भरपावसात निवाºयासाठी अन्यत्र आसरा घ्यावा लागला. परिसरातील घरे, शासकीय गोदामांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात आहे.संजय दत्ताराम पिटनाईक, अनंता चाफेकर, दीपेंद्र शिवलकर, अमनउल्हा घनसार या नागरिकांना वादळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यांची घरे व दुकानांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचले आहे. वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची दखल तहसीलदार कार्यालयाकडून घेण्यात आली. स्थानिक पातळीवर लोकांनी तत्काळ मदत केली. वादळात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी संजय पिटनाईक दुकानात काम करत असताना, पत्रे अचानक तुटल्याने हाताला व पायाला दुखापत झाली. मोबाइल दुकानदार दीपेंद्र शिवलकर यांच्या दुकानातील अनेक मोबाइल पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे खराब झाले. तसेच दुकानाच्या शेजारी असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले.>संततधार सुरूचपनवेल : रविवारी पहाटेपासून पावसाने दमदार सुरु वात केली. मृगाची पहिली सलामी दिल्यानंतर काहीशा रुसलेल्या पावसाने पनवेल शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार धरली. रविवारी पहाटेच्या सुमारास पनवेलमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ही संततधार सुरू होती. तालुक्यात पावसाने चांगला जोर धरला असून काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील धरणे भरण्यासाठी या पावसाचा फारसा उपयोग नसला तरी शेतीसाठी हा पाऊस चांगला मानला जात आहे. सकाळपासून पावसाला बºयापैकी सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार सरींसह संततधार सुरू होती. आठवड्यापूर्वी पावसाने तालुक्यात सुरु वात केली होती. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला होता. पावसाने दडी मारल्याने शेतकरी नाराज झाला होता त्याचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले होते. धान्य पेरलेले असल्याने ते वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र रविवारी पावसाने सुरु वात केल्याने शेतकरीवर्ग सुखावला.>लावणीची कामे पूर्ण : वर्षासहलीसाठी गर्दीअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये फक्त ३३४.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने अनेकांनी सहलीचे बेत आखले होते. त्यामुळे अलिबाग, मुरु ड येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. पावसाने तीन-चार दिवस विश्रांती घेतल्याने तापमान वाढले होते. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. कधी पाऊस तर, कधी ऊन असा खेळ दिवसभर सुरू होता. रविवारी मात्र सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.गेल्या २४ तासांमध्ये अलिबाग-२० मिमी, पेण-२७ मिमी, मुरु ड-१५ मिमी, पनवेल-३९.८० मिमी, उरण-४२ मिमी, कर्जत - ७ मिमी, खालापूर-६ मिमी, माणगाव- २४ मिमी, रोहे- २० मिमी, सुधागड-१२.५० मिमी, तळा- २७ मिमी, महाड, २.२०मिमी, पोलादपूर-१८ मिमी, म्हसळा- २७.४० मिमी, श्रीवर्धन- २७ मिमी, माथेरान -२० मिमी एकूण ३३४.९० मिमी पाऊस पडला.यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.पावसाळी सहलींमुळे अलिबाग, वरसोली, किहीम, नागाव, मुरु ड, काशिद येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. प्रशासनाने समुद्राच्या पाण्यात जाण्यावर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे तेथील जीवरक्षक, बचाव पथक पर्यटकांना खोल पाण्यात जाण्यापासून सूचित करत होते.