शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनमध्ये वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:08 IST

श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले.

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जीवना बंदर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. घरांचे कौले व पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. श्रीवर्धनमध्ये शनिवारी सायंकाळपासूनच पावसाने थैमान घातले आहे. रात्रभर तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. तालुक्यातील जीवना बंदर भागात अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घरांचे पत्रे, कौले उडाल्याने नागरिकांना भरपावसात निवाºयासाठी अन्यत्र आसरा घ्यावा लागला. परिसरातील घरे, शासकीय गोदामांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात आहे.संजय दत्ताराम पिटनाईक, अनंता चाफेकर, दीपेंद्र शिवलकर, अमनउल्हा घनसार या नागरिकांना वादळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यांची घरे व दुकानांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचले आहे. वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची दखल तहसीलदार कार्यालयाकडून घेण्यात आली. स्थानिक पातळीवर लोकांनी तत्काळ मदत केली. वादळात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी संजय पिटनाईक दुकानात काम करत असताना, पत्रे अचानक तुटल्याने हाताला व पायाला दुखापत झाली. मोबाइल दुकानदार दीपेंद्र शिवलकर यांच्या दुकानातील अनेक मोबाइल पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे खराब झाले. तसेच दुकानाच्या शेजारी असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले.>संततधार सुरूचपनवेल : रविवारी पहाटेपासून पावसाने दमदार सुरु वात केली. मृगाची पहिली सलामी दिल्यानंतर काहीशा रुसलेल्या पावसाने पनवेल शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार धरली. रविवारी पहाटेच्या सुमारास पनवेलमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ही संततधार सुरू होती. तालुक्यात पावसाने चांगला जोर धरला असून काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तालुक्यातील धरणे भरण्यासाठी या पावसाचा फारसा उपयोग नसला तरी शेतीसाठी हा पाऊस चांगला मानला जात आहे. सकाळपासून पावसाला बºयापैकी सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार सरींसह संततधार सुरू होती. आठवड्यापूर्वी पावसाने तालुक्यात सुरु वात केली होती. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला होता. पावसाने दडी मारल्याने शेतकरी नाराज झाला होता त्याचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले होते. धान्य पेरलेले असल्याने ते वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र रविवारी पावसाने सुरु वात केल्याने शेतकरीवर्ग सुखावला.>लावणीची कामे पूर्ण : वर्षासहलीसाठी गर्दीअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये फक्त ३३४.९० मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने अनेकांनी सहलीचे बेत आखले होते. त्यामुळे अलिबाग, मुरु ड येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. पावसाने तीन-चार दिवस विश्रांती घेतल्याने तापमान वाढले होते. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. कधी पाऊस तर, कधी ऊन असा खेळ दिवसभर सुरू होता. रविवारी मात्र सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना हायसे वाटले.गेल्या २४ तासांमध्ये अलिबाग-२० मिमी, पेण-२७ मिमी, मुरु ड-१५ मिमी, पनवेल-३९.८० मिमी, उरण-४२ मिमी, कर्जत - ७ मिमी, खालापूर-६ मिमी, माणगाव- २४ मिमी, रोहे- २० मिमी, सुधागड-१२.५० मिमी, तळा- २७ मिमी, महाड, २.२०मिमी, पोलादपूर-१८ मिमी, म्हसळा- २७.४० मिमी, श्रीवर्धन- २७ मिमी, माथेरान -२० मिमी एकूण ३३४.९० मिमी पाऊस पडला.यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.पावसाळी सहलींमुळे अलिबाग, वरसोली, किहीम, नागाव, मुरु ड, काशिद येथील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले होते. प्रशासनाने समुद्राच्या पाण्यात जाण्यावर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे तेथील जीवरक्षक, बचाव पथक पर्यटकांना खोल पाण्यात जाण्यापासून सूचित करत होते.