शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:42 AM

जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

आविष्कार देसाई रायगड : नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयात खेटे मारूनही त्यांना अपेक्षित आणि गुणात्मक समाधान मिळत नाही. यावर आता उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ‘लोकाभिमुख सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करतानाच प्रशासनावर एक प्रकारे थेट अंकुश ठेवला जाणार असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवन जगताना नागरिकांचा प्रशासकीय कामाशी संबंध येतो. काही वेळेला प्रशासकीय लालफीतशाही आडवी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोष व्यवस्थेचा असतो मात्र सरकारच्या नावाने नागरिक खडी फोडतात. सरकार आणि प्रशासन अशा कारणांमुळे संबंध बिघडण्याच्या घटनाही घडलेल्या अनुभवास आलेल्या आहेत. याच कारणासाठी राज्यातील मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जनता दरबार’ अशा संकल्पना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका, विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. यासाठी वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची मूळ संकल्पना असली तरी प्रशासनावरही याच माध्यमातून थेट वचक ठेवण्यात मदतच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रशासन आणि सरकार हे दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असले पाहिजेत. यातील एखादा घटक जरी वरचढ झाला तर मूळ लोकशाही व्यवस्थेला अडचणीचे ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

नागरिकांशी थेट संवादपालकमंत्री कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधणे सोपे जाणार आहे. तसेच कामाचा निपटारा करताना गुणात्मकता जपण्याकडे स्वत: पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता थातूरमातूर उत्तर देता येणार नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांच्याच देखरेखीखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याने त्रास कमी होणार आहे. प्रशानाकडून लवकर होणाऱ्या कामासाठीही काही वेळा जाणीवपूर्वक उशीर होतो. त्यामुळे सातत्याने कार्यालयात खेटे मारूनही काम होत नाही. आता त्यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड