शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पांढऱ्या कांद्याला रोगांचा धोका, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 09:30 IST

अवकाळी पावसा, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील कार्ले, खंडाळे व अन्य परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू असताना पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसासह धुक्यामुळे कांद्यावर मर व करपासारख्या रोगाचा धोका कायमच आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यात कांद्याच्या उत्पादनावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ट व औषधी असल्याने या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वांत जास्त कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात, तर रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांमध्ये काही प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. एकरी सुमारे सहा टन, तर हेक्टरी १५ टन उत्पादन मिळते. दरवर्षी सुमारे तीन कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते. या कांदा लागवडीपासून दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळणार असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेसह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे अधिक बियाणे घेऊन त्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती. भात कापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबरला पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. 

पुन्हा लागवड केलेला कांदा संकटात डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे पाण्यात कुजली.  शेतकऱ्यांनी पांढरा कांद्याची पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या धुक्याचा परिणाम होत असून, कांदा पिकावर करपा रोगाचा धोका वाढला आहे.

टॅग्स :RaigadरायगडonionकांदाRainपाऊस