शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पांढऱ्या कांद्याला रोगांचा धोका, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 09:30 IST

अवकाळी पावसा, धुक्यामुळे ५० टक्के उत्पादन घटणार

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील कार्ले, खंडाळे व अन्य परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू असताना पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसासह धुक्यामुळे कांद्यावर मर व करपासारख्या रोगाचा धोका कायमच आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यात कांद्याच्या उत्पादनावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ट व औषधी असल्याने या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वांत जास्त कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात, तर रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांमध्ये काही प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. एकरी सुमारे सहा टन, तर हेक्टरी १५ टन उत्पादन मिळते. दरवर्षी सुमारे तीन कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते. या कांदा लागवडीपासून दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळणार असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेसह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे अधिक बियाणे घेऊन त्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती. भात कापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबरला पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. 

पुन्हा लागवड केलेला कांदा संकटात डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे पाण्यात कुजली.  शेतकऱ्यांनी पांढरा कांद्याची पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या धुक्याचा परिणाम होत असून, कांदा पिकावर करपा रोगाचा धोका वाढला आहे.

टॅग्स :RaigadरायगडonionकांदाRainपाऊस