शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

तारिक गार्डन दुर्घटनेतील लोकांना न्याय कधी मिळणार? रहिवाशांचा सवाल    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:32 IST

Raigad News : तारिक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली. यामध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ९ जण जखमी झाले. या इमारत दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, तपास यंत्रणा संथ गतीने राबवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जाते आहे का? असा सवाल तारिक गार्डनमधील रहिवाशांनी केला. ता

दासगाव : महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळून जवळपास दोन महिने होत आले, तरी अद्याप या दुर्घटनेचा तपास संथ गतीनेच सुरू आहे. यामुळे तारिक गार्डन रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत असून, तपास यंत्रणेतील अनेक अहवालांना विलंब का लागत आहे, असा सवाल येथील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन केला.तारिक गार्डन ही इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली. यामध्ये १६ जण मृत्युमुखी पडले, तर ९ जण जखमी झाले. या इमारत दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली. मात्र, तपास यंत्रणा संथ गतीने राबवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जाते आहे का? असा सवाल तारिक गार्डनमधील रहिवाशांनी केला. तारिक गार्डमधील रहिवाशांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात एक पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, याचे कथन केले. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या इमारत बांधकाम व्यावसायिक फारुख मेहमूदमिया काझी, युनुस शेख, शशिकांत दिघे, गौरव शहा, बाहुबली धमाणे, दीपक झिंजाड, विवेक डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल असून, अद्याप केवळ चारच आरोपी अटक केल्याचे सांगून, यातील शशिकांत दिघे यांना जामीनही देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे तपसीय अधिकारी शशिकिरण काशीद यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय दबाव असल्याचा आरोपही या रहिवाशांनी केला. 

जखमींना अद्याप मिळाली नाही मदत   या इमारतीच्या अवशेषांचा तपास शासनाच्या व्हीजेटीआयकडून करण्यात आला आहे. तपास करूनही २२ दिवस झाले, तरीही शासकीय निधी उपलब्ध झालेला नाही. शासनाने मृत लोकांना मदत जाहीर केली. मात्र, जखमींना अद्याप मदत केलेली नाही. यामुळे जखमींना आणि बेघर झालेल्या लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. ही केस जलद गतीने चालवून दुर्घटनेतील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी तारिक गार्डन रहिवाशांनी केली. एका अभिनेत्याच्या मृत्युनंतर संपूर्ण देशात न्यायाची मागणी केली. मात्र, या इमारत दुर्घटनेत १६ लोकांचा प्राण गेला असे असूनही शासन दुर्लक्ष करते, यातूनच शासनाला १६ लोकांच्या जिवाची किंमत नसल्याचे अख्तर पठाण यांनी सांगितले.  

व्हीजेटीआयचा तपासणी अहवाल वेळेत पोहोचणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम सिद्ध करण्यास उपयोगी आहे. म्हणून हा अहवाल लवकर मिळावा.- सुरभी मेहता, वकील 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाRaigadरायगड