शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

प्रकल्प उभारणीसाठी काय पाठपुरावा केला?; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:05 IST

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत.

अलिबाग : गेल्या अडीच वर्षांत काहीही काम न करणारे आता खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी त्याच्या राजवटीत राज्यात प्रकल्प  उभारण्यासाठी  काय  काम केले?  त्याचा  एकतरी  पुरावा द्यावा, असे आव्हान उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. जिल्हाधिकारी कायार्लयात सोमवारी जनता दरबार झाल्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली जाईल, असे सांगितले.

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत. त्याबाबत महाविकास  आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘अल्ट्रा मेगा प्रोजेक्टप्रमाणे  विरोधकांकडून अल्ट्रा खोटे बोलून  जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात गेल्या १४ महिन्यांत उच्च  अधिकार  समितीची  एकही बैठक  झालेली नव्हती. त्यामुळे विविध उद्योगासाठी संबंधित कंपन्यांमध्ये कसलाही पत्रव्यवहार झाला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे  वेदांता फॉक्सकॉन, बल्क पार्क, टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यांनी जनतेची  दिशाभूल करण्याऐवजी या प्रकल्पासाठी काय प्रयत्न केले होते, त्याचा एकतरी पुरावा सादर करावा. 

रायगड जिल्ह्यातील बल्क पार्क प्रकल्पाबाबत दीड वर्षात एकही बैठक झालेली नव्हती. मात्र,  आमचे सरकार  आल्यानंतर आपण त्याबाबत बैठक घेऊन बल्क पार्कसाठी केंद्राची मदत मिळणार नसली, तरी एमआयडीसीच्या वतीने स्वत: प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज  ठाकरे  यांनी केलेल्या टीकेबाबत  पालकमंत्री  म्हणाले, ‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, ते डोळ्यांसमोर ठेवून ते बोलले असू शकतात, मात्र त्यांचा गैरसमज झालेला असून आपण स्वत: त्यांची भेट घेऊन सर्व प्रकल्पांबाबतची तारखेनिशी माहिती देऊ.’ 

प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून घेणार 

बल्क प्रकल्पांच्या अनुषंगाने भाजपचे महेश मोहिते यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू  आपण ऐकून घेणार आहोत. ते भाजपचे माजी  पदाधिकारी  असले, तरी त्यांना योग्य त्या सूचना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे मला हा विषय फारसा महत्त्वाचा वाटत नाही.’

टॅग्स :Uday Samantउदय सामंतalibaugअलिबाग