शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

प्रकल्प उभारणीसाठी काय पाठपुरावा केला?; उद्योगमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:05 IST

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत.

अलिबाग : गेल्या अडीच वर्षांत काहीही काम न करणारे आता खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी त्याच्या राजवटीत राज्यात प्रकल्प  उभारण्यासाठी  काय  काम केले?  त्याचा  एकतरी  पुरावा द्यावा, असे आव्हान उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे. जिल्हाधिकारी कायार्लयात सोमवारी जनता दरबार झाल्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आव्हान दिले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली जाईल, असे सांगितले.

राज्यात होणारे औद्योगिक प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातमध्ये जात आहेत. त्याबाबत महाविकास  आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘अल्ट्रा मेगा प्रोजेक्टप्रमाणे  विरोधकांकडून अल्ट्रा खोटे बोलून  जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात गेल्या १४ महिन्यांत उच्च  अधिकार  समितीची  एकही बैठक  झालेली नव्हती. त्यामुळे विविध उद्योगासाठी संबंधित कंपन्यांमध्ये कसलाही पत्रव्यवहार झाला नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळे  वेदांता फॉक्सकॉन, बल्क पार्क, टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यांनी जनतेची  दिशाभूल करण्याऐवजी या प्रकल्पासाठी काय प्रयत्न केले होते, त्याचा एकतरी पुरावा सादर करावा. 

रायगड जिल्ह्यातील बल्क पार्क प्रकल्पाबाबत दीड वर्षात एकही बैठक झालेली नव्हती. मात्र,  आमचे सरकार  आल्यानंतर आपण त्याबाबत बैठक घेऊन बल्क पार्कसाठी केंद्राची मदत मिळणार नसली, तरी एमआयडीसीच्या वतीने स्वत: प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज  ठाकरे  यांनी केलेल्या टीकेबाबत  पालकमंत्री  म्हणाले, ‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, ते डोळ्यांसमोर ठेवून ते बोलले असू शकतात, मात्र त्यांचा गैरसमज झालेला असून आपण स्वत: त्यांची भेट घेऊन सर्व प्रकल्पांबाबतची तारखेनिशी माहिती देऊ.’ 

प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून घेणार 

बल्क प्रकल्पांच्या अनुषंगाने भाजपचे महेश मोहिते यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू  आपण ऐकून घेणार आहोत. ते भाजपचे माजी  पदाधिकारी  असले, तरी त्यांना योग्य त्या सूचना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे मला हा विषय फारसा महत्त्वाचा वाटत नाही.’

टॅग्स :Uday Samantउदय सामंतalibaugअलिबाग