शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

दासगाव, वहूर परिसरातील गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:28 PM

२० दिवसांपासून पाणीसमस्या : स्थानिकांसह प्रा. आरोग्य केंद्रातील रु ग्ण, कर्मचाऱ्यांचे हाल

- सिकंदर अनवारे 

दासगाव : कोथुर्डे धरणातील पाण्यावर दासगाव आणि वहूर परिसरात पाणीपुरवठा केला जातो. कोथुर्डे धरणातील पाणी गांधारी नदीत सोडले जाते. हे पाणी जॅकवेलच्या साहाय्याने मोहोप्रे येथे उचलले जाते. येथून हे पाणी दासगाव-वहूर नळपाणी पुरवठा योजनेला जाते. महाड नाते परिसरातील आणि खाडीपट्टा विभागातील दासगाव-वहूर या परिसरातील गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बांधकामांकरिता हे पाणी लघू पाटबंधारे विभागाने रोखले आहे, यामुळे या परिसरातील गावांना होणारा पाणीपुरवठा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे स्थानिकांसह दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्ण आणि कर्मचाºयांचे हाल झाले आहेत.

गांधारी पुनरुजीवन प्रकल्पातील बंधाºयांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लघू पाटबंधाºयातील अधिकाºयांना हाताशी धरून हे काम पूर्ण करण्यासाठी पाणी सोडणे रोखले गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यामुळे नाते परिसरातील गावांचा आणि खाडीपट्टा विभागातील गावात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. दासगावसह केंबुर्ली, गांधारपाले, वहूर, टोळ या गावांतील पाणीपुरवठा बंद आहे.

दासगावमधील पत्रा शेडमधील नागरिकांची विहीर महामार्ग चौपदरीकरणात बाधित झाल्याने या पाणीपुरवठा योजनेवरच या लोकांना निर्भर राहावे लागत आहे. मात्र, हा पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत.पाण्यासाठी टँकरची व्यवस्थाच्दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही पर्यायी व्यवस्था नसल्याने दासगाव-वहूर पाणीपुरवठा योजनेचेच पाणी वापरले जाते. या ठिकाणीदेखील पाणी न आल्याने येथील कर्मचाºयांना पाणी आणण्यासाठी बादली हातात घेऊन फिरावे लागले.च्पाणी न आल्याने येथे असलेल्या कर्मचारी वसाहतीलाही पाणी मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रु ग्णांना या समस्येला तोंड द्यावे लागले.च्येथील परिस्थितीपासून वहूर येथील सरपंच जितेंद्र बैकर यांनी त्यांच्या स्वखर्चातून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पाण्याचे दोन टँकर देऊन पाणीपुरवठा केला. 

गांधारी नदीत पाणी सोडले नसल्याने दासगाव-वहूर नळ पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा झाला नाही. गांधारी नदीत होत असलेल्या बंधाºयाच्या कामासाठी हे पाणी सोडले गेले नव्हते, अशी माहिती मिळताच पाहणी करून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले, त्यानंतर पाणी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे गावात लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल.- दिलीप उकिर्डे, सरपंच, दासगावप्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पाण्याचे हाल आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचारी वसाहतीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, शिवाय रु ग्णांना पाणी देण्याकरिताही बाहेरून पाणी आणावे लागत आहे.- डॉ. मनाली मोरे,वैद्यकीय अधिकारी, दासगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई