शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

नऊ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:50 IST

पाणीटंचाईचा फटका; खंडाळे, नेहुली, सागाव, तळवली ग्रामस्थ संतप्त

- आविष्कार देसाई अलिबाग : नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी भारत निर्माणअंतर्गत आखण्यात आलेली तब्बल अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना नऊ वर्षे रखडली आहे. त्यामुळेच खंडाळे, नेहुली, सागाव आणि तळवली येथील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासकीय उदासीनतेचाच हा परिणाम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.‘लोकमत’ने या पाणीप्रश्नावर आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पाणीपुरवठा उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी संबंधित ठेकेदारांची तातडीने बैठक बोलावत काम पूर्ण करण्याबबात तंबी दिली आहे. मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीन तीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.खंडाळे परिसरातील पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी भारत निर्माण अंतर्गत दोन कोटी ५० लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला आॅक्टोबर २०११ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली, तर १० फेब्रुवारी २०११ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काम सुरू केल्यानंतर अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्यावर तसेच विहिरी यासह अन्य पर्यायांचा वापर करावा लागत असल्याने ते रोजच्या व्यापाला कंटाळले आहेत.काम करताना आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील राजकारणामुळे काम पूर्ण करणे अवघड झाले आहे. ३१ मे २०२० अखेर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठेके दारनरेश गोंधळी यांनी उपअभियंता एकनाथ कुदळे यांच्या समक्ष दिले. काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल, असेही कुदळे यांनी सांगितले.एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रु. खर्चठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे.आतापर्यंत उद्भव विहिरीसाठी दहा लाख ३६ हजार ९०३, उध्ववाहिनी तीन लाख ३२ हजार ४९२, वितरण व्यवस्था दोन लाख १२ हजार ३७६, पंपहाउस ७८ हजार, पम्पिंग मशीन सहा लाख १६ हजार ६७१, उंच साठवण टाकी १२ लाख २७ हजार १८७ रुपये, दुय्यम उंच टाकी २० लाख १०३ रुपये, फिडरमेन २१ लाख ५४ हजार २८ रुपये यासह अन्य खर्च एक लाख पाच हजार असे एकूण सुमारे एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.योजनेसाठी पैसे आहेत. मात्र, ठेकेदार वेळेवर काम पूर्ण करत नसल्याने काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराला बोलवून काम लवकर पूर्ण करणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही कुदळे यांनी स्पष्ट केले.70% काम आतापर्यंत पूर्णठेकेदाराने आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यासाठी त्याला सुमारे एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.उर्वरित ३० टक्के कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास प्रशासकीय पातळीवरून कोणतीच अडचण नाही.ठेकेदाराच्या आश्वासनानुसार ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे; परंतु ठेकेदाराने पुन्हा चालढकल केल्यास नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीनतीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई