शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कर्जत तालुक्यात दिवाळीत आदिवासी भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 5:06 AM

धाबेवाडी, बांगारवाडीमधील स्थिती : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

नेरळ : कर्जत तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ आणि महिलांना दिवाळी त्रासदायक ठरली आहे. ऐन दिवाळीतच कर्जत तालुक्यातील धाबेवाडी आणि बांगारवाडी आदिवासीवाड्यांमध्ये महिलांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन गावांच्या मध्ये काही वर्षांपूर्वी विहीर शासनाच्या योजनेतून बांधण्यात आली. या विहिरीवर जाण्यासाठीचा मार्ग फार्महाउसच्या मालकांनी काही आश्वासनाच्या जोरावर ग्रामस्थांकडून अडवून ठेवला आहे. त्यामुळे अधिकच लांबून पाणी आणावे लागते. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना पाणी सहज आणणे शक्य होते.

विहिरींत डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत जेमतेम पाणी शिल्लक असते; पण त्यानंतर विहिरी पूर्ण आटून जातात. यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन वेळा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील लोकप्रतिनिधी या आदिवासी बांधवांकडे लक्ष देत नसल्याने, आदिवासी सुविधांपासून वंचित आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्गाने याकडे लक्ष दिले तर पाण्याची समस्यासुटू शकते.पावसाळा संपल्यावर दोन महिन्यांतच विहिरीचे पाणी आटते. त्यानंतर आमच्या आदिवासी महिलांना डवऱ्याने पाणी पाणी भरावे लागते, दिवाळी असूनही आम्हाला डवºयानेच पाणी भरावे लागत आहे. आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- मंजुळा गावंडा, महिला, बांगारवाडीधाबेवाडी येथून विहिरीवर जाण्यासाठी पूर्वीपासूनचा एक रस्ता आहे, बांगारवाडी आणि धाबेवाडी येथील ग्रामस्थ या रस्त्यावरून विहिरीवर जात होते. येथील जागा मुबंईच्या धनिकाने खरेदी केल्याने त्या मालकाने कंपाउंड टाकून रस्ता अडवला आणि वाडीमध्ये पाइप टाकून पाणी दिले जाईल, असे सांगितले; परंतु अद्याप पाइप टाकून दिले नाहीत.- तातू हिंदोळा, ग्रामस्थ, धाबेवाडी

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीKarjatकर्जत