शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

म्हसळा तालुक्यात तीव्र टंचाई : दोन वेळा भूमिपूजन तरीही पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:39 IST

यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले.

- अरुण जंगमम्हसळा : यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात थेंबभर पाणीही नागरिकांना मिळाले नाही. ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, टँकरने पाणीपुरवठ्याबाबत सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा नेहमीच समावेश होतो. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलसिंचन, पाणीक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घसरण झाल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्षात जनतेला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.म्हसळा शहरास भापट येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहरास तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर शहरातील काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहराला पाणीटंचाईने ग्रासले असून, सतत चार वर्षे टंचाईची झळ बसत आहे. गेली दहा वर्षे पाभरा धरणातील पाण्याची वाट परिसरातील नागरिक पाहत आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासानासहित राज्य शासनापर्यंत जाब विचारण्यासाठी शहरातील नागरिकांची सभा घेऊन म्हसळा पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे.शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोतातील पाणी संपल्यामुळे नगरपंचायतीने अनेक ठिकाणी बोअरवेल करून हे पाणी मुख्य टाकीमध्ये साठवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे पाणी शुद्धीकरण केलेले नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे.म्हसळा शहरात दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी एक कोटी ८४ लाख रकमेची योजना मंजूर करून आणली होती; परंतु तत्कालीन कंत्राटदार, सरपंच, सदस्य, पाणी समिती अध्यक्ष यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कामामुळे ही योजना रखडली. त्या योजनेचे दोन वेळा भूमिपूजन झाले; परंतु या योजनेचे दोन थेंब पाणीही म्हसळा शहरवासीयांना अद्यापपर्यंत मिळाले नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड