शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

म्हसळा तालुक्यात तीव्र टंचाई : दोन वेळा भूमिपूजन तरीही पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:39 IST

यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले.

- अरुण जंगमम्हसळा : यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात थेंबभर पाणीही नागरिकांना मिळाले नाही. ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, टँकरने पाणीपुरवठ्याबाबत सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा नेहमीच समावेश होतो. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलसिंचन, पाणीक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घसरण झाल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्षात जनतेला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.म्हसळा शहरास भापट येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहरास तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर शहरातील काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहराला पाणीटंचाईने ग्रासले असून, सतत चार वर्षे टंचाईची झळ बसत आहे. गेली दहा वर्षे पाभरा धरणातील पाण्याची वाट परिसरातील नागरिक पाहत आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासानासहित राज्य शासनापर्यंत जाब विचारण्यासाठी शहरातील नागरिकांची सभा घेऊन म्हसळा पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे.शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोतातील पाणी संपल्यामुळे नगरपंचायतीने अनेक ठिकाणी बोअरवेल करून हे पाणी मुख्य टाकीमध्ये साठवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे पाणी शुद्धीकरण केलेले नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे.म्हसळा शहरात दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी एक कोटी ८४ लाख रकमेची योजना मंजूर करून आणली होती; परंतु तत्कालीन कंत्राटदार, सरपंच, सदस्य, पाणी समिती अध्यक्ष यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कामामुळे ही योजना रखडली. त्या योजनेचे दोन वेळा भूमिपूजन झाले; परंतु या योजनेचे दोन थेंब पाणीही म्हसळा शहरवासीयांना अद्यापपर्यंत मिळाले नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड