शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

म्हसळा तालुक्यात तीव्र टंचाई : दोन वेळा भूमिपूजन तरीही पाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:39 IST

यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले.

- अरुण जंगमम्हसळा : यंदा तापमान प्रचंड वाढल्याने सर्वच ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यात दोन वेळा नळपाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात थेंबभर पाणीही नागरिकांना मिळाले नाही. ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, टँकरने पाणीपुरवठ्याबाबत सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.जिल्ह्यातील चांगल्या पर्जन्यमानाच्या तालुक्यांमध्ये म्हसळा तालुक्याचा नेहमीच समावेश होतो. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलसिंचन, पाणीक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घसरण झाल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्रम, शासनाचे विविध प्रकारचे उपक्रम कागदावरच यशस्वी झाले आहेत. प्रत्यक्षात जनतेला त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.म्हसळा शहरास भापट येथील धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहरास तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर शहरातील काही भागांत टँकरनेच पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.शहराला पाणीटंचाईने ग्रासले असून, सतत चार वर्षे टंचाईची झळ बसत आहे. गेली दहा वर्षे पाभरा धरणातील पाण्याची वाट परिसरातील नागरिक पाहत आहेत. याबाबत नगरपंचायत प्रशासानासहित राज्य शासनापर्यंत जाब विचारण्यासाठी शहरातील नागरिकांची सभा घेऊन म्हसळा पाणी संघर्ष समितीची स्थापना केली आहे.शहरातील मुख्य पाण्याच्या स्रोतातील पाणी संपल्यामुळे नगरपंचायतीने अनेक ठिकाणी बोअरवेल करून हे पाणी मुख्य टाकीमध्ये साठवून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला; परंतु हे पाणी शुद्धीकरण केलेले नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे.म्हसळा शहरात दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी एक कोटी ८४ लाख रकमेची योजना मंजूर करून आणली होती; परंतु तत्कालीन कंत्राटदार, सरपंच, सदस्य, पाणी समिती अध्यक्ष यांच्या भोंगळ व भ्रष्टाचारी कामामुळे ही योजना रखडली. त्या योजनेचे दोन वेळा भूमिपूजन झाले; परंतु या योजनेचे दोन थेंब पाणीही म्हसळा शहरवासीयांना अद्यापपर्यंत मिळाले नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड