शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

२२७ गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: April 27, 2017 00:04 IST

तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोलई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजीरे येथील धरण सोडल्यास

प्रकाश कदम / पोलादपूरतालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोलई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजीरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतीचे अतोनात नुकसान झाले.मात्र, त्यानंतर वाढत्या तापमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडे ठाक पडले आहेत. आतापर्यंत ३८ गावे, १८९ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधन-विहिरी, विहिरींची दुरु स्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास यश आले नाही.जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव- वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. या तालुक्यात एकूण ९ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. शिवकाळात पाण्याचे योग्य नियोजन केल्याचे दिसून येते. गडकोटांवर अजूनदेखील पाणी उपलब्ध आहे. प्रत्येककिल्ल्यावरील सर्व पाण्याच्या टाक्या आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या १०० गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल. असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत. ३८५ पैकी ७० टक्के किल्ल्यांवर बाराही महिने पाणी असते. अगदी भर उन्हाळ्यातदेखील अपुऱ्या देखभालीमुळे दुर्गंधी आणि गाळ साचला आहे.३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणले ते आज आपले राजकारणी साधे अमलात आणू शकत नाहीत हे आपले दुर्दैव आहे. आजही प्रत्येक गावाला आपला विकास म्हणजे गावातील सभामंडप, अंतर्गत रस्ते म्हणजे विकास वाटतो. परंतु २१ व्या शतकात पदार्पण करत असताना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल आणि यामुळे टंचाईग्रस्त भागात दिलासा मिळेल.