शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मेंदडी आदिवासीवाडीचा पाणीप्रश्न सुटला; दोन वर्षे पाण्यासाठी होते तहानलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 23:58 IST

आता नवीन बोअरवेलच्या माध्यमातून मिळणार मुबलक पाणी

- गणेश प्रभाळे दिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगीकरणाची भर पडत आहे. येथे नेहमी पर्यटनाने गजबजलेल्या म्हसळा शहराची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.

विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली, तरी पाण्याच्या समस्येला येथील नागरिक त्रासल्याने ‘लोकमत’ने या समस्येला वाचा फोडली होती. १८ जानेवारी रोजी ‘मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध के ले होते. या वृत्ताची दखल घेऊन पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून नव्याने बोअरवेल बसवून मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे.

दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहराची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात.

पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नव्हते. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण फिरत होते. त्यांच्या या मागणीकडे दीड- दोन वर्षांमध्ये फारसे कोणीही लक्ष दिले नाही. आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता.

तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात येतात. मात्र, या आदिवासीवाडीशेजारी एक किलोमीटर अंतरावर धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवांना मिळत नसल्याने पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले होते.

ग्रामस्थांना रानातील झºयातून पाणी प्यावे लागायचे. प्रशासनाच्या तत्परतेचा अभावामुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. डोंगर माथ्यावरून पाण्यासाठी ये-जा करावी लागत असल्याने लवकरात लवकर पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली असता ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच येथील पाणीप्रश्न वेळेत सोडवण्यात आला.

‘लोकमत’चे आभार

गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नव्हते. पाणीसमस्येमुळे आम्हा ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत, पाणी आणण्यात दिवस जायचा, त्यामुळे मजुरी बुडायची. परिणामी, ‘लोकमत’च्या वृत्त प्रसिद्धी व सततच्या पुढाकाराने आम्हा ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटला आहे. याबाबत ‘लोकमत’चे मेंदडी आदिवासी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.- जाण्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी.

मेंदडी आदिवासीवाडीवर नव्याने बोअरवेल बसवण्यात आली आहे. या बोअरवेलने मुबलक पाणी मिळणार असून, येथील पाणीसमस्या यापुढे कायमस्वरूपी दूर होणार आहे.- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा.

सार्वजनिक विहीर कोरडी असून स्वदेश फाउंडेशनने बांधण्यात आलेली बोअरवेल बंद आहे. दुसरी कोणतीच नळ योजना नसल्याने पाणी नव्हते.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र