शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

मेंदडी आदिवासीवाडीचा पाणीप्रश्न सुटला; दोन वर्षे पाण्यासाठी होते तहानलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 23:58 IST

आता नवीन बोअरवेलच्या माध्यमातून मिळणार मुबलक पाणी

- गणेश प्रभाळे दिघी : रोजगारनिर्मितीसाठी पर्यटनाच्या जोडीला औद्योगीकरणाची भर पडत आहे. येथे नेहमी पर्यटनाने गजबजलेल्या म्हसळा शहराची ओळख आहे. मात्र, पुणे-दिघी महामार्गालगत असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासीवाडीला गेली दोन वर्षे शासनाच्या अनास्थेपायी पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.

विकसित तालुका म्हणून ओळख पुढे येत असली, तरी पाण्याच्या समस्येला येथील नागरिक त्रासल्याने ‘लोकमत’ने या समस्येला वाचा फोडली होती. १८ जानेवारी रोजी ‘मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध के ले होते. या वृत्ताची दखल घेऊन पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून नव्याने बोअरवेल बसवून मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे.

दिघी-पुणे निर्मिती होत असलेल्या मार्गावर हे गाव आहे. एकीकडे झपाट्याने म्हसळा परिसरातील सुविधायुक्त शहराची होत असलेली उभारणी बहुचर्चित आहे. या ठिकाणापासून म्हसळा-दिघी मार्गावर एक किलोमीटरच्या अंतरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मेंदडी आदिवासीवाडीवर साधारण ८० कुटुंबांतील ३४० लोक राहतात.

पाण्याची सुविधा सर्वत्र होत असतानाही मेंदडी आदिवासीवाडीवर अद्यापही पाणी आले नव्हते. परिणामी, येथील आदिवासी पाण्यासाठी मैलोन्मैल वणवण फिरत होते. त्यांच्या या मागणीकडे दीड- दोन वर्षांमध्ये फारसे कोणीही लक्ष दिले नाही. आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला असताना प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काहीच सुविधा पोहोचत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता.

तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाकडून लाखो रुपयांच्या योजना राबवण्यात येतात. मात्र, या आदिवासीवाडीशेजारी एक किलोमीटर अंतरावर धरण असून, या धरणाचे पाणी आदिवासी बांधवांना मिळत नसल्याने पाणी योजनेची मागणी होऊनसुद्धा येथील नागरिक पाण्यावाचून तहानलेले होते.

ग्रामस्थांना रानातील झºयातून पाणी प्यावे लागायचे. प्रशासनाच्या तत्परतेचा अभावामुळे मेंदडी आदिवासीवाडीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. डोंगर माथ्यावरून पाण्यासाठी ये-जा करावी लागत असल्याने लवकरात लवकर पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली असता ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच येथील पाणीप्रश्न वेळेत सोडवण्यात आला.

‘लोकमत’चे आभार

गेल्या दीड वर्षापासून गावात पिण्यासाठी पाणी नव्हते. पाणीसमस्येमुळे आम्हा ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत, पाणी आणण्यात दिवस जायचा, त्यामुळे मजुरी बुडायची. परिणामी, ‘लोकमत’च्या वृत्त प्रसिद्धी व सततच्या पुढाकाराने आम्हा ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटला आहे. याबाबत ‘लोकमत’चे मेंदडी आदिवासी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत.- जाण्या धर्मा वाघमारे, माजी अध्यक्ष, आदिवासी समाज, मेंदडी.

मेंदडी आदिवासीवाडीवर नव्याने बोअरवेल बसवण्यात आली आहे. या बोअरवेलने मुबलक पाणी मिळणार असून, येथील पाणीसमस्या यापुढे कायमस्वरूपी दूर होणार आहे.- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा.

सार्वजनिक विहीर कोरडी असून स्वदेश फाउंडेशनने बांधण्यात आलेली बोअरवेल बंद आहे. दुसरी कोणतीच नळ योजना नसल्याने पाणी नव्हते.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र