शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

रायगडमध्ये भूगर्भातील जलपातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:26 IST

पाच वर्षांच्या सरासरीत ०.४९ मीटरने कमी; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने के ली पाहणी

- जयंत धुळपअलिबाग : भूगर्भातील बेसुमार पाण्याचा उपसा आणि पावसाचे नैसर्गिक पाणी जमिनीत मुरण्याचे कमी झालेले प्रमाण या प्रमुख कारणांबरोबरच नैसर्गिक जंगलांची होणारी बेकायदा कत्तल आणि सिमेंट काँक्रीटचे वाढत चाललेले जंगल, यामुळे रायगड जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात चिंताजनक घट होत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळीत ०.४९ मीटरने घट झाल्याचे दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजना राबविण्यात आल्या आहेत, तरीही जलसाठ्यात भर पडलेली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग हा बेसाल्ट नामक अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मुळातच कमी असते. म्हसळा, श्रीवर्धन, तळा व मुरु ड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकारातील खडक आढळतो. या खडकात काही प्रमाणात पाणी टिकून राहते. दरम्यान बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे डोंंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी डोंगरास तीव्र उतार असल्याने अत्यंत वेगाने थेट समुद्रात वाहून जाते. परिणामी जिल्ह्यात विक्र मी प्रमाणात पाऊस पडून देखील त्यातील फारसे पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी भूजलपातळीत वाढ होत नाही,अशी मुख्य समस्या आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माथेरान या गिरीस्थानी पडतो, परंतु या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सरासरीने०.१२ मीटरने घटली आहे. किनारी भागातील अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यातील भूगर्भात गोडे पाणी झपाट्याने कमी होत आहे. गोड्या पाण्याची जागा खाऱ्या पाण्याने घेतल्याने बोअरवेल्स आणि विहिरी यांना खारे पाणी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. रायगडमध्ये ६० टक्के पाणीपुरवठा विहीर, बोअरवेल यांच्या माध्यमातून होते. परंतु हेच पाणी खारे होत असल्याने पाणीपुरवठा योजनांमधून मिळणारे पाणी अनेक गावांमध्ये पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतींच्या आहेत. भूगर्भात कमी झालेले पाणी आणि किनारी भागात विहिरींचे गोडे पाणी खारे होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे भविष्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अहवालात नमूद आहे.नैसर्गिक पाणी जिरवणे गरजेचेरायगड जिल्ह्यातील भविष्यातील गंभीर पाणीटंचाईची समस्या टाळण्याकरिता जिल्ह्यात पावसाचे नैसर्गिक पाणी जिरविण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा उपाय रायगड भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डी.बी. ठाकूर यांनी सुचविला आहे.दर चार महिन्यांनी भूजल सर्वेक्षण केले जाते. मात्र, अलीकडे नोंदविण्यात आलेल्या नोंदी विशेष लक्ष वेधून घेणाºया आहेत. सुधागड आणि पोलादपूर या दोन तालुक्यातील डोंगराळ भागात काही विहिरींमध्ये कमालीची घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.भूजल पातळीत घट होण्याची कारणेबेसुमार जंगलतोड आणि वणव्यांमुळे नष्ट होणारी वृक्षराजी.शहरीकरण होत असताना सिमेंट काँक्रीटने जमीन झाकली जावून पाणी जमिनीत मुरण्यात निर्माण झालेला अडसर.रेनवॉटर हार्वेस्टिंगचे अपेक्षित प्रयत्न अपुरे.पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेच्या नियोजनातील तांत्रिक चुका.बोअरवेल्सच्या माध्यमातून बेसुमार जलउपसा.नैसर्गिक जलस्रोत असणाºया नद्यांतील पाणी प्रदूषणाने दूषित होणे.खाडी व समुद्र किनारच्या भागातील विहिरींमध्ये पाझरणारे खारे पाणी.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी