शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जॅकवेलमधून ग्रामस्थांनी काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:58 IST

फिल्टर पाणी कधी मिळणार; संतप्त पालीकरांचा सवाल

पाली : गेल्या १५ दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाणी प्यावे लागत होते; परंतु सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे ग्रामपंचाय सदस्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी फिल्टर झालेले शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल संतप्त पालीकरांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. अंबा नदीची पातळी खाली गेल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत होते; परंतु त्यावर उपाययोजना म्हणून जॅकवेलच्या विहिरीतून गाळ काढण्यात आला आहे. आता पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पाली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले. पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे पालीमधील विविध सरकारी कार्यालय आणि सुधागड तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून, पाली शहराची मोठी लोकसंख्या आहे.

शहराला अंबा नदीपासून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपासून पूर्वी परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी दूषित, गढूळ झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या विहिरीत गाळ जमा झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वीच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. ग्रामपंचायतीमार्फ त १९ आॅक्टोबर रोजी जॅकवेलच्या विहिरीतून व जवळील गॅलरीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता, थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते, अशाप्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

पाली हे अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. पालीची लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ पाणी व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळातून चक्क जीवंत साप, खुबे, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लाल फितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी