शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जॅकवेलमधून ग्रामस्थांनी काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:58 IST

फिल्टर पाणी कधी मिळणार; संतप्त पालीकरांचा सवाल

पाली : गेल्या १५ दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाणी प्यावे लागत होते; परंतु सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे ग्रामपंचाय सदस्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी फिल्टर झालेले शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल संतप्त पालीकरांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. अंबा नदीची पातळी खाली गेल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत होते; परंतु त्यावर उपाययोजना म्हणून जॅकवेलच्या विहिरीतून गाळ काढण्यात आला आहे. आता पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पाली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले. पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे पालीमधील विविध सरकारी कार्यालय आणि सुधागड तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून, पाली शहराची मोठी लोकसंख्या आहे.

शहराला अंबा नदीपासून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपासून पूर्वी परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी दूषित, गढूळ झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या विहिरीत गाळ जमा झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वीच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. ग्रामपंचायतीमार्फ त १९ आॅक्टोबर रोजी जॅकवेलच्या विहिरीतून व जवळील गॅलरीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता, थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते, अशाप्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

पाली हे अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. पालीची लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ पाणी व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळातून चक्क जीवंत साप, खुबे, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लाल फितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी