शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जॅकवेलमधून ग्रामस्थांनी काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:58 IST

फिल्टर पाणी कधी मिळणार; संतप्त पालीकरांचा सवाल

पाली : गेल्या १५ दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाणी प्यावे लागत होते; परंतु सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे ग्रामपंचाय सदस्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी फिल्टर झालेले शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल संतप्त पालीकरांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. अंबा नदीची पातळी खाली गेल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत होते; परंतु त्यावर उपाययोजना म्हणून जॅकवेलच्या विहिरीतून गाळ काढण्यात आला आहे. आता पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पाली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले. पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे पालीमधील विविध सरकारी कार्यालय आणि सुधागड तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून, पाली शहराची मोठी लोकसंख्या आहे.

शहराला अंबा नदीपासून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपासून पूर्वी परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी दूषित, गढूळ झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या विहिरीत गाळ जमा झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वीच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. ग्रामपंचायतीमार्फ त १९ आॅक्टोबर रोजी जॅकवेलच्या विहिरीतून व जवळील गॅलरीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता, थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते, अशाप्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

पाली हे अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. पालीची लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ पाणी व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळातून चक्क जीवंत साप, खुबे, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लाल फितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी