शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जॅकवेलमधून ग्रामस्थांनी काढला गाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 23:58 IST

फिल्टर पाणी कधी मिळणार; संतप्त पालीकरांचा सवाल

पाली : गेल्या १५ दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाणी प्यावे लागत होते; परंतु सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे ग्रामपंचाय सदस्यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी फिल्टर झालेले शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल संतप्त पालीकरांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. अंबा नदीची पातळी खाली गेल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत होते; परंतु त्यावर उपाययोजना म्हणून जॅकवेलच्या विहिरीतून गाळ काढण्यात आला आहे. आता पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पाली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर दुर्गे, श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले. पाली शहर हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. यामुळे पालीमधील विविध सरकारी कार्यालय आणि सुधागड तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून, पाली शहराची मोठी लोकसंख्या आहे.

शहराला अंबा नदीपासून पाणीपुरवठा करण्यात येतो. काही दिवसांपासून पूर्वी परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी दूषित, गढूळ झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जॅकवेलच्या विहिरीत गाळ जमा झाला होता. म्हणून काही दिवसांपूर्वीच पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. ग्रामपंचायतीमार्फ त १९ आॅक्टोबर रोजी जॅकवेलच्या विहिरीतून व जवळील गॅलरीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला.पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता, थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते, अशाप्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.

पाली हे अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. पालीची लोकसंख्याही १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ पाणी व दूषित पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळातून चक्क जीवंत साप, खुबे, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे. पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लाल फितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Waterपाणी