शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पेठ गावचे ग्रामस्थ विहीर खोदण्यासाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:31 AM

पाणीटंचाईची झळ; टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनता

कर्जत : तालुक्यात ऐतिहासिक पेठचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गाव वसलेले असून टेंभरे ग्रामपंचायत हद्दीत येते. अशा या गावात आता पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. याला टेंभरे ग्रामपंचायतीची उदासीनताच कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, या ग्रामस्थांनी नुसते आरोप करत न बसता एकत्रित येऊन साथी हाथ बढाना... असे म्हणत रणरणत्या उन्हात श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या विहिरीला पाणी लागून या गावकऱ्यांची तहान भागेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.आपल्या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पाणी कुठे मिळते का यासाठी अनेक गावात हंडा कळशी घेऊन भटकावे लागते. यासाठी ग्रामपंचायतीने पाण्याचा प्रश्न सोडविण्याकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे. आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते मंडळींनी लक्ष देणे गरजेचे होते. ऐतिहासिक पेठचा किल्ल्याचा विचार करून आतापर्यंत पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे होती; पण याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत, सरपंच, लोकप्रतिनिधी मग मते मागायला येतात कशाला, असा उपरोधिक सवाल ग्रामस्थ करीत आहेत. टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील पेठ गावाची लोकसंख्या सुमारे ३०० च्या आसपास आहे. पाण्याची वाढती समस्या लक्षात घेऊन अखेर नाईलाजाने ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी गावात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले आहे.