शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उरणचा वीजनिर्मिती प्रकल्पच गॅसवर; अपुऱ्या वायूपुरवठ्यामुळे सहापैकी चार संच बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 09:55 IST

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे.

- मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : ऐन उन्हाळ्यात वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांची घामाने भिजून काहिली होत असताना वीजटंचाईचे चटके सामान्यांना सोसावे लागत आहेत. उरणच्या बोकडविरा  ग्रामपंचायतींच्या हद्दीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या विद्युत केंद्राला (जीटीपीएस) गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात गॅसपुरवठाच होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील सहापैकी चार विद्युतनिर्मिती संच बंदच ठेवावे लागत असल्याने ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची क्षमता निम्म्याहून अधिक घटली आहे. या घटलेल्या वीज निर्मितीमुळे राज्यातील वीज तुटवड्यात आणखीनच भर पडली आहे.

जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर १९८५ मध्ये उरणचा वायू विद्युत प्रकल्प उभारला आहे. सहा संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी ३.५ दशलक्ष क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, सुरुवातीपासूनच केवळ २.६ ते २.८ क्युबिक मीटर या सरासरीनुसारच गॅसचा पुरवठा होत होता. त्यानंतर मागील काही वर्षांपासून वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी २.५ दररोज क्युबिक मीटर गॅसची आवश्यकता आहे. मात्र, फक्त सरासरी १.०५ क्युबिक मीटर गॅसचा पुरवठा गेल कंपनीकडून होत आहे. मागील काही वर्षांपासून आवश्यकतेनुसार गॅसपुरवठा होत नसल्याने सहापैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पातून आता दररोज २५० ते ३०० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.       

वीजनिर्मितीचे संच सातत्याने बंद ठेवावे लागत असल्याने कोट्यवधी खर्चून उभारलेले हे संच भंगारात जाऊन नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या केंद्राचे विस्तारीकरण करण्याची योजनाही आखली होती. यामुळे प्रकल्पाची क्षमता वाढून १२२० मेगावॅटपर्यंत पोहचणार होती. मात्र १२२०  वीजनिर्मितीच्या या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला आहे.

केंद्र, ओएनजीसी ठरवते धोरणवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी  शंभर टक्के गॅसपुरवठा झाल्यास सध्याची प्रकल्पाची क्षमतेप्रमाणे ६०० मेगावॅटची वीजनिर्मिती करणे फारसे अवघड नाही. मात्र, गॅसचा किती प्रमाणात पुरवठा करावा याबाबतचे धोरण केंद्र सरकार आणि ओएनजीसी व गेल या कंपन्यांच्या माध्यमातून ठरत असल्याने त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रकल्पाला सध्या गॅसपुरवठा केला जातो. त्यामुळे अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळेच वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

१.०५ इतकाच गॅस पुरवठागेल कंपनीकडून आवश्यकतेनुसार जीटीपीएसला याआधीही कधीही गॅसपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ६७२ मेगावॉट वीजनिर्मितीचे सहापैकी चार संच याआधीच बंद पडले आहेत. उर्वरित सुरू असलेल्या वीजनिर्मितीच्या दोन संचासाठी आवश्यक असणाऱ्या २.५ क्युबिक मीटरऐवजी फक्त १.०५ इतकाच गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती केंद्राची क्षमता २५०-३०० मेगावॅटपर्यंत घसरली आहे. त्यामुळे  या प्रकल्पाच्या विस्ताराचा प्रश्नही गॅसच्या कमतरतेमुळे प्रलंबित राहिला असल्याची माहिती जीटीपीएसचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी दिली.

टॅग्स :electricityवीज