शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

अवकाळीमुळे उरणचे शेतकरी चिंताग्रस्त; आंबा, वाल, चवळीसह भाजीपाला धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:30 IST

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.

उरण : उरण परिसरातील मागील काही दिवसांपासून बदलेले हवामान आणि शनिवारी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे आंबा मोहोर, फळांसह इतर पिके धोक्यात येण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

उरण परिसरात मागील काही दिवसांपासून कधी दमट, कधी वाढती थंडी, तर कधी ढगाळ वातावरण, काळे मेघ दाटून येणे अशाप्रकारे सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सातत्याने बदलत्या या बेमोसमी हवामानाचा परिणाम आंबा मोहोर, शेवगा, रब्बी पिकांतील वाल, तूर, उडीद, मूग, चवळी, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी, कारली यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर पिके धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.    - सुरेश पाटील, शेतकरी

आणखी अवकाळी पाऊस पडला तर आंबा मोहोर, शेवग्याची फुले गळून जाण्याची शक्यता आहे. अल्पावधीतील भाजीपाला पिकांना फारसा धोका नाही. मात्र, त्यानंतरही पाहणी करून नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.     - अर्चना सुळ,     तालुका कृषी अधिकारी  

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस