शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवकाळीमुळे उरणचे शेतकरी चिंताग्रस्त; आंबा, वाल, चवळीसह भाजीपाला धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:30 IST

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.

उरण : उरण परिसरातील मागील काही दिवसांपासून बदलेले हवामान आणि शनिवारी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे आंबा मोहोर, फळांसह इतर पिके धोक्यात येण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

उरण परिसरात मागील काही दिवसांपासून कधी दमट, कधी वाढती थंडी, तर कधी ढगाळ वातावरण, काळे मेघ दाटून येणे अशाप्रकारे सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सातत्याने बदलत्या या बेमोसमी हवामानाचा परिणाम आंबा मोहोर, शेवगा, रब्बी पिकांतील वाल, तूर, उडीद, मूग, चवळी, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी, कारली यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर पिके धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे.    - सुरेश पाटील, शेतकरी

आणखी अवकाळी पाऊस पडला तर आंबा मोहोर, शेवग्याची फुले गळून जाण्याची शक्यता आहे. अल्पावधीतील भाजीपाला पिकांना फारसा धोका नाही. मात्र, त्यानंतरही पाहणी करून नुकसान अहवाल सादर करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.     - अर्चना सुळ,     तालुका कृषी अधिकारी  

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस