शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दासगावच्या शेतकऱ्यांचा शेतावरचा प्रवास होडीतून, भातलावणीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:32 IST

ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते.

- सिकंदर अनवारेदासगाव : ऐन पावसाळ्यात भातलावणीसाठी खांद्यावर नांगर, डोक्यावर भाताच्या रोपांचे भारे, हातात बैलांची जोडी, महिलांच्या डोक्यावर न्याहारीची टोपली असे चित्र सर्वत्र दिसून येते. मात्र, महाडमधील दासगावमधील भोई वाड्यातील शेतक-यांना त्यांच्या शेतावर जायचे असेल तर होडीतून प्रवास करत जावे लागते. गावापासून असलेल्या एका बेटावर असलेल्या जमिनीवर शेकडो एकर भात शेती आहे. याठिकाणी जाण्यासाठी सावित्रीचे पात्र ओलांडून जावे लागते.सध्या भातलावणीला सर्वत्र जोर असून जिकडे तिकडे भात शेतात लावणी करणारे शेतकरी, नांगर धरलेले शेतकरी दिसून येत आहेत. डोक्यावर भाताची रोपे घेवून शेतात काम करणारे शेतकरी सर्वत्र दिसत असले तरी तालुक्यातील दासगावमध्ये मात्र लावणीकरिता होडीतून प्रवास करणारे शेतकरी दिसून येतात. दासगाव हे पूर्वीचे बंदर असलेले गाव. सावित्री नदीच्या काठावर हे गाव असले तरी हा संपूर्ण परिसर खाडीपट्टा म्हणूनच ओळखला जातो. खाडीचे खारे पाणी या भागात शिरल्याने अनेक ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी जमिनीची झीज होवून या भागात बेट तयार झाले आहेत. दासगावमधील बाग नावाने एक बेट असून या बेटावर दासगावमधील भोईआळीतील शेतकºयांच्या जमिनी आहेत. जवळपास २० हून अधिक शेतकºयांच्या जमिनी याठिकाणी आहेत. ऐन पावसाळ्यात मात्र या शेतकºयांना आपल्या शेतावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. पाण्याचा प्रवाह असला तरी या होडीतूनच जीवघेणा प्रवास गेली अनेक पिढ्या सुरू आहे. बाग नावाचे हे बेट शिवकाळाआधीपासून अस्तित्वात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. याठिकाणी शिवकाळातील देखील वस्ती असावी असा निष्कर्ष येथे असलेल्या जुन्या विहिरी आणि दगडी वस्तूंवरून दिसून येत आहे.दासगावमधील भोईवाडीतील शेतकरी प्रतिदिन शेतावर भातलावणीसाठी लागणारे सामान, नांगर, दोºया, न्याहारी हे सर्व डोक्यावरून नव्हे तर सावित्रीच्या खळखळणाºया पाण्याच्या प्रवाहातून होडीतून प्रवास करत शेतावर जावे लागत आहे. येथील शेतकºयांनी शेतावर जाण्यासाठी छोट्या होड्या घेतल्या आहेत. या बेटावर शेकडो एकर भात जमीन असून भात पिकाबरोबरच उन्हाळ्यात विविध कडधान्ये घेतली जातात. या बेटाच्या चहुबाजूंनी सावित्री खाडीचे पाणी असल्याने पूर्वी कडधान्य मोठ्या प्रमाणावर येत असत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक पाण्याने जेव्हापासून खाडीचे पात्र बाधित झाले होते तेव्हापासून कडधान्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सुरू असलेल्या भात लावणीसाठी देखील तेथील विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे.येथील जमीन ही सखल असल्याने पाणी साचून राहत नाही. यामुळे जेव्हा पाऊस सुरू होतो त्या पावसाच्या पाण्यातच नांगरणी करून चिखल केला जात आहे.बेटावर असलेल्या घाणेकरीन मातेच्या आशीर्वादाने आजतागायत आम्हाला या बेटावर येताना कोणतीच अडचण आलेली नसल्याचे येथील ग्रामस्थ कृष्णा पडवळ यांनी सांगितले. या बेटावर घाणेकरीन मातेचे स्थान आहे. एका भल्या मोठ्या वृक्षाखाली हे स्थान असून शेतकºयांची अपार श्रद्धा आहे. प्रतिवर्षी या बेटावर येणारे शेतकरी देवीकडे होडीतून सुखरूप प्रवास आणि चांगली शेती याकरिता मनोभावे साकडे घालतात. देवीच्या या स्थानावर नमस्कार करूनच शेतकरी मग पुढे आपल्या शेतात कामाला लागतात.शिवकालीन विहिरीचा पाण्याकरिता वापरशिवकालीन बांधणीच्या येथे दोन विहिरी आहेत. दासगावमध्ये दौलतगड असल्याने याठिकाणी शिवकालीन वस्ती असल्यानेच या विहिरी बांधल्या गेल्या असाव्यात. एक विहीर ही गोलाकार तर दुसरी विहीर देखील गोलाकार असून विहिरीत जाण्यासाठी भुयारीमार्ग आणि पायºया बांधल्या गेल्या आहेत. उन्हाळ्यात याठिकाणी शेतकरी कडधान्य काढतात. चहुबाजूने पाणी असले तरी खाडीच्या पाण्याचा वापर अधिक होत नसल्याने या विहिरीच्या गोड्या पाण्याचा वापरच केला जातो. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हेच विहिरीतील पाणी वापरले जाते.चहुबाजूच्या पाण्याने जमिनीची होते धूपया बेटाच्या चहुबाजूला सावित्रीचे खाडीपात्र आहे. पावसाळ्यात येथील पाण्याला वेग असतो. प्रतिवर्षी आदळणाºया लाटांनी जमिनीच्या कडेची धूप होत आहे. जमिनीच्या कडेला असलेली माती दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. यामुळे या शेतकºयांच्या जमिनीच्या शेजारी संरक्षण भिंत असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मातीची धूप कमी होवून शेतजमीन शाबूत राहील.आम्ही गेली अनेक पिढ्या होडीनेच आमच्या शेतात भातलावणीसाठी जात असतो. हे बेट कधी झाले हे आमच्या मागील पिढीला देखील ज्ञात नाही. मात्र, जोराच्या पावसात आम्हाला शेतावर जाणे धोकादायक वाटते. कधी कधी पाण्याचा प्रवाह अधिक असला तर याठिकाणी जाणे शक्य होत नाही.- विनोद पडवळ, शेतकरीआमच्या गावातील भोईवाडीतील शेतकरी बेटावर शेती करण्यासाठी होडीतून जातात. या बेटावर शेकडो एकर जमीन असून याठिकाणी जाण्याकरिता पुलाची व्यवस्था झाल्यास विविध प्रकारची शेती करता येणे शक्य आहे. शिवाय या बेटाचा विकास होऊन शेतकºयांना देखील फायदा होणार आहे- दिलीप उकीर्डे, सरपंच दासगाव

टॅग्स :Raigadरायगड