शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:37 PM

वाहन चालक हैराण; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पेण : मंगळवारी रात्रीपासून पेण परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी पावसामुळे पाणी साचून महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. पेण शहरानजीकच्या तरणखोप (पेण बायपास) ते रामवाडी (बसस्थानक) पर्यंतचा ६ किमीच्या टप्प्यात वाहनांची भलीमोठी लांबच लांब रांग बुधवारी सकाळपासून महामार्गावर लागलेली आहे. रामवाडी ते पेण हा एक किमीचा अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासाचा कालावधी लागत होता. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी वर्ग व विद्यार्थी यांना महामार्गावरच वाहनातून उतरून आपापल्या कामाच्या ठिकाणी व शाळा ठिकाणी जावे लागत आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशी दयनीय अवस्था राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी बसस्थानकापासून पेण रेल्वे स्थानक, अंतोरा फाटा आणि त्यापुढे तरणखोप गावापर्यंतच्या पेण-खोपोली बायपास रस्त्यापर्यंत महामार्ग जाम झालेला होता. जोरदार पडणारा पाऊस महामार्गावर साचलेले पावसाचे पाणी आणि त्या पाण्याखाली असलेले खड्डे याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने वाहने आदळून नुकसान होत आहे. महामार्गाचे तिन्ही मार्ग वाहनांनी भरलेले असल्याने पाच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या पेण शहरात प्रवेश करताना तब्बल तास दीड तासाचा कालावधी लागत होता. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहून आलेल्या वाहनातून उतरून महामार्गावरच पायी चालत आपला मोर्चा शाळांकडे वळवला. कामानिमित्त आलेल्या नोकरदार वर्ग व्यावसायिक मजूर यांनी सुद्धा या प्रकारची दखल घेत चक्क गाड्या सोडून महामार्गावर चालत पेण शहर गाठले. पेण शहरातील अंतर्गत रस्त्यामध्ये सुद्धा या महामार्गावरील कोंडीचा फ टका बसला. एकंदर आजची वाहतूककोंडी नागरिकांना व प्रवासी वर्गाला मनस्ताप देणारे ठरली, तर बाहेरच्या प्रवासी वाहनांना सुद्धा याचा फटका बसला.

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा