शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने उजळली राजमाता जिजाऊंची समाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 22:43 IST

कष्टकरी महिलांना भाऊबीजेची भेट : मावळा जवान संघटनेने के ला दीपोत्सव साजरा

पोलादपूर : मावळा जवान संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील ऐतिहासिक समाधीवर दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊंचा समाधी परिसर शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. पाचाड, रायगड, महाड परिसरातील कष्टकरी महिलांना साड्या चोळ्यांची भाऊबीज भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंच्या जय घोषात मावळ्यांनी राजमाता जिजाऊंना वंदन केले.

समाधीवर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांच्या वंशजांनी दीपोत्सव साजरा करून शिवकाळ जागा केला. राजमाता जिजाऊ यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळावर झेंडुंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कष्टकरी महिलांना भाऊबीज भेट देण्यात आली.

शुर योद्धा गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड, सुभेदार सुयार्जी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, रायप्पाचे वंशज शरद मोरे, रायगड किल्ल्याचे अभ्यासक सुधाकर लाड, सरदार हिरोजी तनपुरे यांचे वंशज विजय तनपुरे, संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, आण्णासाहेब चव्हाण, शिवव्याख्याते तानाजी मरगळे , संदीप दळवी, संजय भिताडे, ज्ञानेश्वर कामथे, कृपालराजे महाडीक आदींसह रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई आदी ठिकाणच्या महिला, शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संयोजन मावळा जवान संघटनेचे युवा अध्यक्ष रोहित नलावडे व अविनाश रांजणे यांनी केले.वैभवशाली शिवकाळ जिवंत झाला-मालुसरेडॉ. शितल मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाच्या पाठीवर सर्वप्रथम लोकशाहीवादी स्वंतत्र राष्ट्र निर्माण केले त्या हिंदवी स्वराज्याचा रणसंग्राम राजमाता जिजाऊ यांच्या त्यागाने अजरामर झाला आहे असे सांगितले. चंद्र सूर्य असे पर्यंत राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र मानवतावादी कायाचा अनमोल ठेवा सदैव तेवत राहणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व वीर मावळ्यांच्या प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा यासाठी प्रथमच मावळा जवान संघटनेच्या वतीने दीपोत्सव व कष्टकरी महिलांना भाऊबीज भेट देऊन मानवंदना दिल्याने रायगडाच्या मातीत वैभवशाली शिवकाळ जिवंत झाला असल्याचे सांगितले.