शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मच्छीमारांवर उपासमारीची आली वेळ; लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:38 IST

सागरकन्या मच्छीमार सोसायटीकडून मदतीची मागणी

आगरदांडा: कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगडचे पालकमंत्री- आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी २६ जुलैपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता, सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने खरेदी करणारे ग्राहाकांनी मच्छी खरेदीसाठी पाठ फिरवल्याने छोटे मच्छीमार कोळीबांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनला १२५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले, तरी लॉकडाऊन कमी होताना दिसत नाही. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या कोळी बांधवांचे, तसेच गरीब मजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने, ही अशीच परिस्थिती राहिली, तर जगायचे कसे, हा प्रश्न गरीब कोळीबांधवांना पडला आहे.

रोजच्या रोज लहान होड्यांतून समुद्र किनाºयाजवळील समुद्रात मच्छी पकडून आपला उदारनिर्वाह कसातरी करीत असतात. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मच्छी घेण्याकरिता ग्राहक नसल्यामुळे पकडलेली मच्छी रोजच्या रोज फुकट जात आसल्याने, कोळीबांधवांनी हाताश होऊन अखेर आपल्या होड्या किनाºयावर शाकारून ठेवण्यात आल्या.

कोळी बांधवांना कोणी वाली आहे का? हा प्रश्न पडला असून, कोळी बांधवांवर संकटावर संकट पडू लागले आहेत. आॅगस्ट, २०१९ पासून सुरू झालेल्या हंगमापासून तीन वादळे आणि लॉकडाऊन, तसेच निसर्ग चक्रीवादळ, यामुळे मच्छीमार पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शासन लॉकडाऊनवर लॉकडाऊन करत आहे.

कोळी समाजावर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने विशेष भरपाई पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी केली, तसेच निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजूनपर्यंत प्राप्त नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची दखल घेत त्वरीत मदत करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfishermanमच्छीमार