शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

मच्छीमारांवर उपासमारीची आली वेळ; लॉकडाऊनचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:38 IST

सागरकन्या मच्छीमार सोसायटीकडून मदतीची मागणी

आगरदांडा: कोरोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगडचे पालकमंत्री- आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी २६ जुलैपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता, सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने खरेदी करणारे ग्राहाकांनी मच्छी खरेदीसाठी पाठ फिरवल्याने छोटे मच्छीमार कोळीबांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये लॉकडाऊनला १२५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले, तरी लॉकडाऊन कमी होताना दिसत नाही. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या कोळी बांधवांचे, तसेच गरीब मजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने, ही अशीच परिस्थिती राहिली, तर जगायचे कसे, हा प्रश्न गरीब कोळीबांधवांना पडला आहे.

रोजच्या रोज लहान होड्यांतून समुद्र किनाºयाजवळील समुद्रात मच्छी पकडून आपला उदारनिर्वाह कसातरी करीत असतात. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मच्छी घेण्याकरिता ग्राहक नसल्यामुळे पकडलेली मच्छी रोजच्या रोज फुकट जात आसल्याने, कोळीबांधवांनी हाताश होऊन अखेर आपल्या होड्या किनाºयावर शाकारून ठेवण्यात आल्या.

कोळी बांधवांना कोणी वाली आहे का? हा प्रश्न पडला असून, कोळी बांधवांवर संकटावर संकट पडू लागले आहेत. आॅगस्ट, २०१९ पासून सुरू झालेल्या हंगमापासून तीन वादळे आणि लॉकडाऊन, तसेच निसर्ग चक्रीवादळ, यामुळे मच्छीमार पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शासन लॉकडाऊनवर लॉकडाऊन करत आहे.

कोळी समाजावर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने विशेष भरपाई पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी केली, तसेच निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजूनपर्यंत प्राप्त नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची दखल घेत त्वरीत मदत करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfishermanमच्छीमार