शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर; विद्यार्थ्यांसाठी आव्हान तर शिक्षकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:29 IST

अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संतोष सापते

श्रीवर्धन : व्यक्ती विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि निर्णायक असते. शिक्षण हे व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्यातील महत्त्वाचे अवजार आहे. भारतीय समाज मन प्रगल्भ, जागृत, संवेदनशील, तसेच सजग करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. काळानुरूप शिक्षण पद्धतीमधील स्थित्यंतर आपण पाहात आला आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने डिजिटल शिक्षण पद्धती अंगीकाराच्या उंबरठ्यावर आज आपण उभे ठाकलो आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे.

जीवनात घडलेल्या बदलांचा स्वीकार करून, त्याद्वारे अध्ययन व अध्यापन प्रगल्भ करण्याचे काम शिक्षकरूपी गुरुजनांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे. आजमितीस पुन्हा एकदा शिक्षणाच्या नव्या अध्यायास सुरुवात होत आहे. कोरोनामुळे शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितच काही निर्णायक बदल घडणार आहेत. आगामी काळामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील अंतर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी शिक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे आॅनलाइन शिक्षण हा पर्याय एकमेव आहे, असे निश्चितच नाही. शिक्षणाविषयी विविध मार्ग, पर्याय आजही उपलब्ध होऊ शकतात. त्यानुसार, जागृत पालकाने पुढाकार घेणे अगत्याचे आहे. कारण आज प्रत्येक घरातील शिक्षित आणि सुशिक्षित वर्गाची संख्या निश्चितच वाढलेली आहे. कोरोनामुळे घरात एक तरी व्यक्ती मुलांच्या नियमित सान्निध्यात राहू शकतात. घरात आई, बाबा, दादा कुणीतरी एक व्यक्ती घरात जर वेळ काढू शकला, तर मुलांचे शिक्षण निश्चितच सुरळीतपणे चालू शकते. नाहीतर तसेही खासगी शिकवणीला फक्त मुलांना रट्टा मारायला, घोकंमपट्टी करायला शिकवलं जातं ते निदर्शनात आलेला आहे. आज जवळपास सर्व शालेय पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यानुसार, पालकाने पुस्तक खरेदी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. आॅनलाइन शिक्षण पद्धतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होईल, असे वाटत नाही. नेटवर्कमधील अडचणी, घरातील आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणामधील उत्साह आवश्यक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याला मोकळं वातावरण, समवयस्क मित्र, प्रशिक्षित व मनमिळावू शिक्षक वर्ग या सर्व बाबी उपलब्ध असतात, तसेच अध्ययन व अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील ह्युमन टच हा शिक्षणासाठी निर्णायक असतो. आॅनलाइन शिक्षणामध्ये असे घडत नाही. त्याचप्रमाणे, सातत्याने डिजिटल शिक्षण घेताना मोबाइलचा अति वापर झाल्याने पाठ, मान, डोळे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.अगोदर कोरोनाचे संकट व नंतर चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा मुलगा इयत्ता नववीच्या वर्गात आहे. तो अभ्यासासाठी मोबाइल घेऊन बसतो. मात्र, थोड्या वेळातच त्याचे लक्ष विचलित होऊन तो मोबाइलमधील इतर अ‍ॅप्स चालू करतो. त्यामुळे मी व माझी पत्नी नियमित जवळपास दोन तास बसून पाठ्यपुस्तकातील दोन दोन प्रकरणे वाचून घेतो व नंतर त्याला समजावून सांगतो, असे पालक संदीप आव्हाड यांनी सांगितले.सद्य:स्थितीत कोरोनामुळे शिक्षणात अनेक बदल होणार आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचे आमचे दायित्व असेल, त्यानुसार आम्ही आमचे दायित्व पूर्ण करणार आहोत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊ.- घनश्याम गायकवाड, शिक्षक, नगर परिषद, श्रीवर्धन

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी