शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:42 IST

तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही.

- प्रकाश कदमपोलादपूर : तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. देवळे धरण नावाला असून त्यात पाण्याचा दुष्काळ आहे, पाण्याच्या योग्य नियोजनअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतीचे अतोनात नुकसान होते. एप्रिल महिना सुरू झाला की तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागते, वाढत्या तपमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडतात. आतापर्यंत २३ गावे आणि १०६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधण विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास पूर्ण अपयश आले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. या तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातील किनेश्वर, लोहारे खोंडा, कोंढवी धरणाचे काम प्राथमिक टप्प्यात चालू झाले आहे. अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. सध्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण विभागामार्फत आराखड्यात गोवेळे, देवळे, कापडे बु., बोरघर, आडवले, येथे बंधारे सुचविण्यात आले. मात्र, मापदंडात बसत नसल्याचे कारण देत बहुतांश गावांतील बंधारे रद्द करून प्रशासनाने आपला नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. हिरवळ प्रतिष्ठान, स्वदेशसारख्या स्वयंसेवी संस्था लोकसहभागातून बंधारे घेत पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची भटकंती सुरूचदरवर्षी कातळी बंगला, पवारवाडी, काळवली, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, महाळगूर-मोरेवाडी, गोळेगणी, पिंपवळवाडी, आंबेमाची, पळचीळ-धनगरवाडी, कोसमवाडी, चिरेखिंड, महाळगूर, तामसडे, वाकण, धामणेचीवाडी, मुरावाडी, गावठाण, केवनाळे, पळचीळ-जळाचीवाडी, किनेश्वर-पेढावाडी, बोरघर-बौद्धवाडी, वाकण-बौद्धवाडी, वडघरबुद्रुक, कामथे-आदिवासीवाडी, जांभाडी, कोडबे कोंड, चाळीचा कोंड, काळवली-तिवडेकर मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, कुंभळवणे, क्षेत्रफळ, आमळेवाडी, तुटवली, धनगरवाडी व बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, येळंगेवाडी, वडघर-सणसवाडी, केवनाळे, अंबेमाची देऊळवाडी, फौजदारवाडी, गोवेले, तळ्याची वाडी, जननीचा माळ, बाळमाची, मोरसडे, पोफळ्याचा मुरा, देवळे, दाभील, भोगाव-पार्टेवाडी या वाडींसह साळवीकोंड, चांभारगणी, गोवळे अशा २४ गावे व १०६ वाडी-पाड्यांवर पाण्याचे संकट ओढावते.पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या धरणाऐवजी प्रत्येक नदीवर साखळी पद्धतीने बंधारे झाल्यास तालुक्याची पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. संबंधित अधिकारीवर्गाने याबाबत आराखडा तयार करून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवावा.- बबिता दळवी, सरपंच, देवळेदेशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. जलयुक्त शिवारमधील आराखड्यातील कामे पूर्ण झाली नाहीत. जलसंधारणकडून बंधाºयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणीप्रश्न तसाच राहिला आहे.- सीताराम पोकळे,केवनाळे, ग्रामस्थ

टॅग्स :droughtदुष्काळ