शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:42 IST

तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही.

- प्रकाश कदमपोलादपूर : तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. देवळे धरण नावाला असून त्यात पाण्याचा दुष्काळ आहे, पाण्याच्या योग्य नियोजनअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतीचे अतोनात नुकसान होते. एप्रिल महिना सुरू झाला की तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागते, वाढत्या तपमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडतात. आतापर्यंत २३ गावे आणि १०६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधण विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास पूर्ण अपयश आले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. या तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातील किनेश्वर, लोहारे खोंडा, कोंढवी धरणाचे काम प्राथमिक टप्प्यात चालू झाले आहे. अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. सध्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण विभागामार्फत आराखड्यात गोवेळे, देवळे, कापडे बु., बोरघर, आडवले, येथे बंधारे सुचविण्यात आले. मात्र, मापदंडात बसत नसल्याचे कारण देत बहुतांश गावांतील बंधारे रद्द करून प्रशासनाने आपला नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. हिरवळ प्रतिष्ठान, स्वदेशसारख्या स्वयंसेवी संस्था लोकसहभागातून बंधारे घेत पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची भटकंती सुरूचदरवर्षी कातळी बंगला, पवारवाडी, काळवली, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, महाळगूर-मोरेवाडी, गोळेगणी, पिंपवळवाडी, आंबेमाची, पळचीळ-धनगरवाडी, कोसमवाडी, चिरेखिंड, महाळगूर, तामसडे, वाकण, धामणेचीवाडी, मुरावाडी, गावठाण, केवनाळे, पळचीळ-जळाचीवाडी, किनेश्वर-पेढावाडी, बोरघर-बौद्धवाडी, वाकण-बौद्धवाडी, वडघरबुद्रुक, कामथे-आदिवासीवाडी, जांभाडी, कोडबे कोंड, चाळीचा कोंड, काळवली-तिवडेकर मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, कुंभळवणे, क्षेत्रफळ, आमळेवाडी, तुटवली, धनगरवाडी व बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, येळंगेवाडी, वडघर-सणसवाडी, केवनाळे, अंबेमाची देऊळवाडी, फौजदारवाडी, गोवेले, तळ्याची वाडी, जननीचा माळ, बाळमाची, मोरसडे, पोफळ्याचा मुरा, देवळे, दाभील, भोगाव-पार्टेवाडी या वाडींसह साळवीकोंड, चांभारगणी, गोवळे अशा २४ गावे व १०६ वाडी-पाड्यांवर पाण्याचे संकट ओढावते.पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या धरणाऐवजी प्रत्येक नदीवर साखळी पद्धतीने बंधारे झाल्यास तालुक्याची पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. संबंधित अधिकारीवर्गाने याबाबत आराखडा तयार करून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवावा.- बबिता दळवी, सरपंच, देवळेदेशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. जलयुक्त शिवारमधील आराखड्यातील कामे पूर्ण झाली नाहीत. जलसंधारणकडून बंधाºयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणीप्रश्न तसाच राहिला आहे.- सीताराम पोकळे,केवनाळे, ग्रामस्थ

टॅग्स :droughtदुष्काळ