शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमधील २३ गावे, १०६ वाड्या दुष्काळग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:42 IST

तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही.

- प्रकाश कदमपोलादपूर : तालुक्यात सावित्री, ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आदी नद्या पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. सावित्री नदीवरील बाजिरे येथील धरण सोडल्यास तालुक्यात एकही धरण नाही. देवळे धरण नावाला असून त्यात पाण्याचा दुष्काळ आहे, पाण्याच्या योग्य नियोजनअभावी फेब्रुवारीपासून तालुक्यातील बऱ्याच गावात पाणीटंचाई जाणवते. पाण्याअभावी शेतीचे अतोनात नुकसान होते. एप्रिल महिना सुरू झाला की तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागते, वाढत्या तपमानामुळे नदी, नाले, ओढे कोरडेठाक पडतात. आतापर्यंत २३ गावे आणि १०६ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे. यात दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावपाड्यांची संख्या अधिक असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकावे लागत आहे.मागील दहा वर्षांत पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याचा मागोवा घेतला तर या गाववाड्यांवर विंधण विहिरी, विहिरींची दुरुस्ती, साठवण टाकी, नळ पाणीपुरवठा योजना, छोटे तलाव आदी विकासकामांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आजमितीस एकाही गाववाडीची पाणीटंचाईची समस्या सोडवण्यास पूर्ण अपयश आले आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे तहानलेल्या गाव वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. या तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातील किनेश्वर, लोहारे खोंडा, कोंढवी धरणाचे काम प्राथमिक टप्प्यात चालू झाले आहे. अन्य ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे चालू होऊ शकली नाहीत. सध्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण विभागामार्फत आराखड्यात गोवेळे, देवळे, कापडे बु., बोरघर, आडवले, येथे बंधारे सुचविण्यात आले. मात्र, मापदंडात बसत नसल्याचे कारण देत बहुतांश गावांतील बंधारे रद्द करून प्रशासनाने आपला नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. हिरवळ प्रतिष्ठान, स्वदेशसारख्या स्वयंसेवी संस्था लोकसहभागातून बंधारे घेत पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची भटकंती सुरूचदरवर्षी कातळी बंगला, पवारवाडी, काळवली, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, महाळगूर-मोरेवाडी, गोळेगणी, पिंपवळवाडी, आंबेमाची, पळचीळ-धनगरवाडी, कोसमवाडी, चिरेखिंड, महाळगूर, तामसडे, वाकण, धामणेचीवाडी, मुरावाडी, गावठाण, केवनाळे, पळचीळ-जळाचीवाडी, किनेश्वर-पेढावाडी, बोरघर-बौद्धवाडी, वाकण-बौद्धवाडी, वडघरबुद्रुक, कामथे-आदिवासीवाडी, जांभाडी, कोडबे कोंड, चाळीचा कोंड, काळवली-तिवडेकर मोहल्ला, पाटीलवाडी, बौद्धवाडी, कुंभळवणे, क्षेत्रफळ, आमळेवाडी, तुटवली, धनगरवाडी व बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, येळंगेवाडी, वडघर-सणसवाडी, केवनाळे, अंबेमाची देऊळवाडी, फौजदारवाडी, गोवेले, तळ्याची वाडी, जननीचा माळ, बाळमाची, मोरसडे, पोफळ्याचा मुरा, देवळे, दाभील, भोगाव-पार्टेवाडी या वाडींसह साळवीकोंड, चांभारगणी, गोवळे अशा २४ गावे व १०६ वाडी-पाड्यांवर पाण्याचे संकट ओढावते.पोलादपूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या धरणाऐवजी प्रत्येक नदीवर साखळी पद्धतीने बंधारे झाल्यास तालुक्याची पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. संबंधित अधिकारीवर्गाने याबाबत आराखडा तयार करून तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवावा.- बबिता दळवी, सरपंच, देवळेदेशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. जलयुक्त शिवारमधील आराखड्यातील कामे पूर्ण झाली नाहीत. जलसंधारणकडून बंधाºयाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणीप्रश्न तसाच राहिला आहे.- सीताराम पोकळे,केवनाळे, ग्रामस्थ

टॅग्स :droughtदुष्काळ