शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:26 IST

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला

जमीर काझी

इर्शाळवाडी (जि. रायगड) : वार बुधवार. रात्रीचे ११ ते ११:३० वाजलेले... आदिवासी पाड्यावर कोसळत्या पावसात अन् गार वाऱ्यात ४९ कुटुंबं गाढ झापेत होते... तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत आला अन् त्याने अर्ध्याहून अधिक गाव गिळले. मदतीसाठी हाक देण्याचीही अनेकांना संधी मिळाली नाही.. १६ जणांना या दरडीने गिळले...

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मृत्यूचा हा डोंगरच कोसळला. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. 

नेमके काय घडले?मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली.किती मोठा थर?दरडी कोसळून घरांवर सुमारे ३० ते ३५ फुटांचा दगड-मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे सद्य:स्थितीत अशक्यप्राय बनले आहे.

मदतकार्यात प्रचंड अडथळे घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. 

पायथ्याशी नियंत्रण कक्षn घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. n खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

 

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार लोकमत न्यूज नेटवर्क । अलिबाग (जि. रायगड) : बचावकार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्राधान्य  दिले जात असून, त्याचे नियोजन  झाले आहे.  कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती; परंतु, ती खराब हवामानामुळे पोहोचू शकलेली नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित आहेत. अधिकारी, बचाव पथकाच्या संपर्कात मी रात्रीपासून होतो, असे शिंदे यांनी सांगितले. बचावकार्य करणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे. यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री