शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:26 IST

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला

जमीर काझी

इर्शाळवाडी (जि. रायगड) : वार बुधवार. रात्रीचे ११ ते ११:३० वाजलेले... आदिवासी पाड्यावर कोसळत्या पावसात अन् गार वाऱ्यात ४९ कुटुंबं गाढ झापेत होते... तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत आला अन् त्याने अर्ध्याहून अधिक गाव गिळले. मदतीसाठी हाक देण्याचीही अनेकांना संधी मिळाली नाही.. १६ जणांना या दरडीने गिळले...

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मृत्यूचा हा डोंगरच कोसळला. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. 

नेमके काय घडले?मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली.किती मोठा थर?दरडी कोसळून घरांवर सुमारे ३० ते ३५ फुटांचा दगड-मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे सद्य:स्थितीत अशक्यप्राय बनले आहे.

मदतकार्यात प्रचंड अडथळे घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. 

पायथ्याशी नियंत्रण कक्षn घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. n खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

 

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार लोकमत न्यूज नेटवर्क । अलिबाग (जि. रायगड) : बचावकार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्राधान्य  दिले जात असून, त्याचे नियोजन  झाले आहे.  कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती; परंतु, ती खराब हवामानामुळे पोहोचू शकलेली नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित आहेत. अधिकारी, बचाव पथकाच्या संपर्कात मी रात्रीपासून होतो, असे शिंदे यांनी सांगितले. बचावकार्य करणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे. यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री