शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची 'दरड', अश्रूंचा पाऊस; बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:26 IST

२४ तासांनंतरही ढिगारे जैसे थे, हुंदका अन् आक्रोशाने आसमंत हळहळला

जमीर काझी

इर्शाळवाडी (जि. रायगड) : वार बुधवार. रात्रीचे ११ ते ११:३० वाजलेले... आदिवासी पाड्यावर कोसळत्या पावसात अन् गार वाऱ्यात ४९ कुटुंबं गाढ झापेत होते... तेवढ्यात मातीचा मोठा ढिगारा डोंगरावरून घरंगळत आला अन् त्याने अर्ध्याहून अधिक गाव गिळले. मदतीसाठी हाक देण्याचीही अनेकांना संधी मिळाली नाही.. १६ जणांना या दरडीने गिळले...

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मृत्यूचा हा डोंगरच कोसळला. दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. 

नेमके काय घडले?मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली.किती मोठा थर?दरडी कोसळून घरांवर सुमारे ३० ते ३५ फुटांचा दगड-मातीचा थर साचला आहे. त्यामुळे हा ढिगारा काढणे सद्य:स्थितीत अशक्यप्राय बनले आहे.

मदतकार्यात प्रचंड अडथळे घटनास्थळी पोहोचल्यावर एनडीआरएफच्या जवानांशिवाय अन्य कोणातही मदत करण्याची ताकद उरली नव्हती. अन्य बचाव पथक व औद्योगिक कारखान्यातून मागविण्यात आलेल्या मजूर वर्ग यांच्याकडील साधनेही अपुरी पडत होती. ही वाडीवर पोहोचण्यास निसरडी पायवाट, कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. 

पायथ्याशी नियंत्रण कक्षn घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. n खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

 

 

 

बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार लोकमत न्यूज नेटवर्क । अलिबाग (जि. रायगड) : बचावकार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्राधान्य  दिले जात असून, त्याचे नियोजन  झाले आहे.  कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती; परंतु, ती खराब हवामानामुळे पोहोचू शकलेली नाहीत, असे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित आहेत. अधिकारी, बचाव पथकाच्या संपर्कात मी रात्रीपासून होतो, असे शिंदे यांनी सांगितले. बचावकार्य करणारे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथे मदत आणि बचावकार्य अवघड आहे. यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. 

टॅग्स :RaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्री