शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 00:27 IST

चार धरणांतील पाण्याचा विसर्ग निर्माण करतो पूरपरिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : मान्सूनचे आगमन वेळेवरच होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जागी झाली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी यासंदर्भात व्हिडिओकॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन अधिकारी वर्गाशी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार हे गृहीत धरून तातडीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबतीत आढावा घेतला.

पेणमध्ये हेटवणे आंबेघर शहापाडा व बाळगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून हंगामात पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे भोगावती, बाळगंगा, नद्यांच्या पातळीत होणारी धोकादायक वाढ यामुळे पेण ग्रामीण भागातील पूरपरिस्थितीसाठी हाताळणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आवाक्याबाहेर असते. यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर्षी मान्सून हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार जून महिन्यात १०६ टक्के, जुलैमध्ये ९९ टक्के, ऑगस्ट महिन्यांत, ९७ टक्के व सप्टेंबर महिन्यात ११६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसरीकडे समुद्राला १८ दिवस हायटाइड उधाण भरतीच्या ४.७८ मीटर पाणी पातळीत वाढ होईल. नद्यांच्या धोकादायक पूररेषेत भोगावती नदीकाठी पेण शहर, अंतोरे, नवघर, पाटणोली, सापोलीबेडी, कणे, भोगावती नदीचा प्रवाहासमोर कणे गाव येत असल्याने या खाडीकिनारचा संरक्षक बंधारा वेगवान प्रवाहाच्या धडकेने फुटतो आणि अखंड गाव पुराने वेढले जाते. या नदीपात्रात आंबेघर व हेटवणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग व आपत्कालीन परिस्थितीत धरणाचे उघडले जाणारे दरवाजे अशा परिस्थितीत या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने आताच संभाव्य उपाययोजना केल्या पाहिजेत. दुसरीकडे दक्षिण बाजूकडील शहापाडा धरणातील पाणीसाठा लवकर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ओव्हरफ्लो होऊन ते पाणी वाशी नाका मार्गे कणे खाडीत येत असल्याने परिस्थिती भयानक बनते. रहदारीचे मार्ग बंद होतात. यात आणखी भर पडते ती पावसाळी येणाऱ्या उधाण भरतीच्या पाणीपातळीची भरतीची पाणीपातळी नद्यांच्या प्रवाहाला अडविणे आणि पुराच्या पाण्याची पातळी होत्याच नव्हते करते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही मोठी जबाबदारी आहे.

बाळगंगा नदीकिनारी उपाययोजना आवश्यक बाळगंगा नदीकिनारी खरोशी दूरशेत, जिते तर पातालगंगा नदी प्रवाह दुष्मी, खारपाडा, जिते, यावे, जोहे, तांबडशेत, दादर या गावांना वेणीत जात अरबी समुद्रात विसावते. धरणे, नद्यांच्या पट्ट्यातील येणार पाणी आणि समुद्राला येणारी उधाण भरती यांचा ताळमेळ योगायोग जुळून येत असल्याने पेण शहर व ग्रामीण भागातील नदी व खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Raigadरायगड