शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 20:07 IST

Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad: सुनिल तटकरेंनी रायगडच्या सभेत अनंत गीतेंना लगावला सणसणीत टोला

Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad: महाविकास आघाडी आणि महायुती असा संघर्ष सध्या महाराष्ट्राला नवीन नाही. गेल्या दीड-दोन वर्षात अनेक घडामोडी घडल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. तशातच आता लोकसभा निवडणूकही तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून सर्वच शिलेदार जोर लावताना दिसत आहे. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील रायगडच्या मतदारसंघाचा समावेश आहे. यंदा रायगडमधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरे गटाच्या अनंत गीते यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अजितदादा गटाचे सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगडात प्रचारसभांचा धडाका सुरु असतानाच आज सुनील तटकरेंनीअनंत गीतेंवर टीकेची तोफ डागली. पेण विधानसभा मतदारसंघात सुधागड तालुक्यातील परळी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली.

अनंत गीते यांना रायगडमधून २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. पण २०१९च्या निवडणुकीत मोदी लाट असूनही अंतर्गत कलहामुळे गीते यांच्या पराभव झाला होता. सुनील तटकरेंना तेथे विजय मिळाला होता. पण यंदा तटकरे आणि गीते यांच्यात कोण बाजी मारणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशा परिस्थितीत, तटकरेंनी अनंत गीते यांच्या मतदारयादीत नाव नसल्याच्या मुद्द्यावरून घणाघात केला. "रायगड लोकसभा मतदारसंघात असलेल्या गावात अनंत गीते यांचे मतदारयादीत नाव नाही. ज्या व्यक्तीचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, जे आपले मत गेली आठ टर्म फुकट घालवत आहेत; त्या व्यक्तीला लोकांच्या मतांची किंमत काय समजणार," असा सणसणीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

"सुधागड तालुक्यातील आजवरच्या सभा या रेकॉर्डब्रेक सभा झाल्या आहेत. जशी रेकॉर्डब्रेक गर्दी तुम्ही सर्व सभांना केली आहे, तसेच रेकॉर्ड ब्रेक मतदान करा आणि मला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. हे राष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहिले आहे, म्हणून आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सहभागी झालो. आमच्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यामध्ये 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' हा मंत्र देण्यात आला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे बिल मांडले होते, ते बिल नंतर राहुल गांधी यांनी फाडून टाकले. त्यांची ही वृत्ती सर्वांनी पाहिली आहे. आज काँग्रेस मोदी सरकारवर संविधान बदलणार असल्याचा आरोप करत आहेत, पण तुम्ही जे वागलात ते लोक विसरणार नाहीत," असेही तटकरे म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४sunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगड