शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:48 IST

ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख मिळणार

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार आहे. ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी मालामाल होऊन त्यांना सुगीचे दिवस येण्यास मदत मिळणार आहे.पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिली. शेतमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी लागणाºया विविध सोयी-सुविधा लवकरच निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा, काजू, चिकू, तोंडली, कांदा, अशा अनेक पिकांबरोबरच फळे आणि भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. त्याचा फायदा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने घेतो. जिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकाला चांगला दर मिळावा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी शेतमालासाठी विक्र ी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतमालाचे ऑनलाइन मार्के टिंग करून थेट शेतकºयांना विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यातून करण्यात येणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम पेणमध्ये उभारण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकºयांना सर्व पिकाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनाही आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्व, मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून कृषी पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत मिळेल.ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतकरी होणार मालामालऑनलाइन विक्री व्यवहारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदतच होणार आहे.अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचला, त्याचप्रमाणे येथील विविध पिकांनाही त्याच दिशेने नेता येणे शक्य होणार आहे.आॅनलाइन मार्केटिंगमुळे अडते, दलाल हे बाजूला पडून थेट उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा व्यवहार होणार असल्याचा फायदा येथील शेतकºयांना होऊन शेतकरी चांगलाच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते.पर्यटकांना शेतमालाशी जोडणारजिल्ह्यातील लहान शेतकºयांपासून मोठ्या शेतकºयांचा आर्थिक विकास या केंद्राद्वारे होणार आहे. आॅनलाइन नोंदणी करून स्थानिक शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्व मालाची चव, वैशिष्ट्ये याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सांगितले.शेतमाल विक्री केंद्र ठरणार मैलाचा दगडरायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्र असणाºया मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध शेतमालाचे प्रचंड उत्पादन घेतले गेले. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य दर कधीच मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनसुद्धा शेतमालाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्हा मागासलेलाच राहिला, असे म्हणणे योग्य ठरेल. पेण येथे विक्री केंद्र उभारण्याचा रायगड जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनagricultureशेती