शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:48 IST

ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख मिळणार

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार आहे. ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी मालामाल होऊन त्यांना सुगीचे दिवस येण्यास मदत मिळणार आहे.पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिली. शेतमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी लागणाºया विविध सोयी-सुविधा लवकरच निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा, काजू, चिकू, तोंडली, कांदा, अशा अनेक पिकांबरोबरच फळे आणि भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. त्याचा फायदा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने घेतो. जिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकाला चांगला दर मिळावा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी शेतमालासाठी विक्र ी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतमालाचे ऑनलाइन मार्के टिंग करून थेट शेतकºयांना विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यातून करण्यात येणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम पेणमध्ये उभारण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकºयांना सर्व पिकाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनाही आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्व, मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून कृषी पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत मिळेल.ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतकरी होणार मालामालऑनलाइन विक्री व्यवहारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदतच होणार आहे.अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचला, त्याचप्रमाणे येथील विविध पिकांनाही त्याच दिशेने नेता येणे शक्य होणार आहे.आॅनलाइन मार्केटिंगमुळे अडते, दलाल हे बाजूला पडून थेट उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा व्यवहार होणार असल्याचा फायदा येथील शेतकºयांना होऊन शेतकरी चांगलाच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते.पर्यटकांना शेतमालाशी जोडणारजिल्ह्यातील लहान शेतकºयांपासून मोठ्या शेतकºयांचा आर्थिक विकास या केंद्राद्वारे होणार आहे. आॅनलाइन नोंदणी करून स्थानिक शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्व मालाची चव, वैशिष्ट्ये याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सांगितले.शेतमाल विक्री केंद्र ठरणार मैलाचा दगडरायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्र असणाºया मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध शेतमालाचे प्रचंड उत्पादन घेतले गेले. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य दर कधीच मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनसुद्धा शेतमालाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्हा मागासलेलाच राहिला, असे म्हणणे योग्य ठरेल. पेण येथे विक्री केंद्र उभारण्याचा रायगड जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनagricultureशेती