शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतमालाला येणार सुगीचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:48 IST

ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख मिळणार

- आविष्कार देसाई अलिबाग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार आहे. ऑनलाइन विक्री व्यवहाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी मालामाल होऊन त्यांना सुगीचे दिवस येण्यास मदत मिळणार आहे.पेण येथे शेतमाल विक्री केंद्र उभारणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिली. शेतमाल विक्री केंद्र उभारण्यासाठी लागणाºया विविध सोयी-सुविधा लवकरच निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात भाताबरोबरच आंबा, काजू, चिकू, तोंडली, कांदा, अशा अनेक पिकांबरोबरच फळे आणि भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते; परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकºयांनी घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. त्याचा फायदा व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने घेतो. जिल्ह्यातील शेतकºयांच्या सर्वच पिकाला चांगला दर मिळावा, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी शेतमालासाठी विक्र ी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतमालाचे ऑनलाइन मार्के टिंग करून थेट शेतकºयांना विक्री केलेल्या मालाची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यातून करण्यात येणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम पेणमध्ये उभारण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकºयांना सर्व पिकाची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. शेतकºयांनाही आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्व, मार्गदर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमातून कृषी पर्यटनवाढीला चालना मिळण्यास मदत मिळेल.ऑनलाइन मार्केटिंगमुळे शेतकरी होणार मालामालऑनलाइन विक्री व्यवहारामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतमालाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदतच होणार आहे.अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा जागतिक स्तरावर पोहोचला, त्याचप्रमाणे येथील विविध पिकांनाही त्याच दिशेने नेता येणे शक्य होणार आहे.आॅनलाइन मार्केटिंगमुळे अडते, दलाल हे बाजूला पडून थेट उत्पादक शेतकरी ते ग्राहक असा व्यवहार होणार असल्याचा फायदा येथील शेतकºयांना होऊन शेतकरी चांगलाच मालामाल होणार असल्याचे बोलले जाते.पर्यटकांना शेतमालाशी जोडणारजिल्ह्यातील लहान शेतकºयांपासून मोठ्या शेतकºयांचा आर्थिक विकास या केंद्राद्वारे होणार आहे. आॅनलाइन नोंदणी करून स्थानिक शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांनी उत्पादित केलेल्या सर्व मालाची चव, वैशिष्ट्ये याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर देणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सांगितले.शेतमाल विक्री केंद्र ठरणार मैलाचा दगडरायगड जिल्हा देशाचे आर्थिक केंद्र असणाºया मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कित्येक वर्षे रायगड जिल्ह्यात विविध शेतमालाचे प्रचंड उत्पादन घेतले गेले. मात्र, शेतकºयांना त्याचा योग्य दर कधीच मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनसुद्धा शेतमालाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्हा मागासलेलाच राहिला, असे म्हणणे योग्य ठरेल. पेण येथे विक्री केंद्र उभारण्याचा रायगड जिल्हा परिषदेने घेतलेला निर्णय जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनagricultureशेती