शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:30 AM

ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापनाच्या वादात संरक्षण भिंत रखडली

-कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला अनेक वर्षांपासून संरक्षण भिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम रखडल्याचे समोर आले आहे. या वादात सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून असणाऱ्या कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारी माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय ही शाळा सध्या चर्चेच विषय बनली आहे. १९८१ मध्ये शाळेची स्थापना झाली आहे, तेव्हापासून आजपर्यंत शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. शाळेच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुमारे ३५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नाही, त्यामुळे शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत सध्या शिशु वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळा व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची काळजी घेतल्याचे दिसत नाही.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळा सुटण्याच्या वेळेला सर्व विद्यार्थी राज्यमार्गावर येत असल्याने भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने सकारात्मक विचार करून या शाळेला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे.शाळेची कुंपण भिंत बांधण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत, यासाठी मोजमाप केले आहे. ८० मीटर लांबीची भिंत बांधून एक प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या काही अडचणी येत आहेत, त्या सोडवून भिंत पूर्ण केली जाईल.- पी. डी. वखारकर, मुख्याध्यापक, भाऊसाहेब राऊत विद्यालयचिंचवली ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाºयांच्या मान्यतेने १५ वर्षांच्या कराराने जी जागा शाळेसाठी दिली होती. त्यांनी त्या वेळेसच कुंपण करणे आवश्यक होते. आता कुंपण भिंत बांधताना कल्याण-कर्जत राज्यमार्ग आणि शाळेचे कुंपण यामध्ये पालकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा सोडावी, तसेच शिशु मंदिराजवळ असणारी अतिरिक्त जागा ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, तसेच अन्य शासकीय कार्यालयाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी. ही अतिरिक्त जागा सोडून कुंपण भिंत बांधण्यास कोणाची हरकत नाही.- रामदास भगत, सदस्य, चिंचवली ग्रामपंचायत 

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळाStudentविद्यार्थी