शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

वादळाचा म्हसळ्यातील शाळा, अंगणवाड्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:17 AM

निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

उदय कळस ।

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळात म्हसळा तालुक्यातील शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीची कौले, पत्रे उडाले, भिंती पडल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानात पाच लाखांपासून पन्नास लाखांपर्यत नुकसान झाले असून तालुक्यातील सुमारे ११० प्राथमिक शाळा, १०० माध्यमिक शाळा, ८० अंगणवाड्या आणि महाविद्यालये यांची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या म्हसळा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्याने अनेक शाळांच्या इमारतींचे पत्रे, कौले फुटली असून भिंती खचल्या आहेत. परिसरातील झाडे इमारतींवर पडल्याने इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. कमीत कमी ५० ते ६० हजारांपासून ४० ते ५० लाखांचे प्रत्येक इमारतीचे नुकसान झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना कोणत्या प्रकारे सुरू करावे, इमारतीच्याा डागडुजीचे काय? सरकरी मदत कशा प्रकारे मिळेल? इमारत दुरुस्तीपर्यंत शाळांचे काय, असे अनेक प्रश्न शाळा व्यवस्थापनास पडले आहेत. वादळाच्या ताडाख्याचा परिणाम शाळांच्या भौतिक सुविधांवर पडला असून देणगीतून निधी जमा करून उभारलेल्या सुसज्ज शाळांचे झालेले नुकसान पाहून नागरिक, पालक चिंता व्यक्त करीत आहेत.शाळांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष तसेच सोलार सिस्टीम यांचे नुकसान होऊन हीच रक्कम २ ते ४ लाखांच्या घरात जाते. त्यामुळे या नुकसानीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शिक्षणप्रेमी करीत आहेत. निसर्ग वादळाने शाळेच्या भौतिक सुविधांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ असल्याने वीज आणि मोबाइल सेवा विस्कळीत झाल्याने त्यांचा जगाशी संपर्क तुटल्यामुळे अडचणींमध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळा