शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू;  ९९ हजारांपैकी १५ हजार विद्यार्थी हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:24 IST

रायगडमधील ८०६ शाळा सुरू;

आविष्कार देसाईरायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झाल्याने जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या १९३० शाळांपैकी ८०६ शाळा सुरू झाल्या आहेत. ९९ हजार १६३ विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त १५ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर तब्बल ८३ हजार ७८० विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी दांडी मारली. अद्यापही पालकांमध्ये काेराेनाबाबतची भीती दूर झाली नसल्याचे दिसून येते.

मार्च २०२० पासूनच जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर काेराेनाचा आलेख वाढतच गेला. त्यामुळे जून महिन्यात सुरू हाेणारे शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. आधी नववी ते बारावी आणि २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काेराेनाचा हाेणारा प्रसार बऱ्यापैकी थांबलेला आहे. तसेच आता काेराेनावरील लसदेखील आलेली आहे. त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पहिल्या दिवशी म्हणावी तशी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली नाही. पाचवी ते आठवीमधील विद्यार्थी वयाने लहानच आहेत. त्यामुळे काेराेनाबाबतच्या नियमांबाबत त्यांच्या मनात तेवढी जागृती आणि गांभीर्य नसावे. त्यामुळे पालक आपापल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे आजच्या संख्येवरुन दिसून येते. 

पहिल्याच दिवशी मैत्रीणी भेटल्या आम्ही शाळेत मज्जा केली. ऑनलाइन शिकून कंटाळाला आला हाेता. प्रत्यक्षात शिक्षकांना पाहूनही आनंद झाला. अजूनही आमच्या काही मैत्रिणी शाळेत आलेल्या नाहीत.- विधी पाटील, विद्यार्थीनी

शाळेचा पहिला दिवस असल्याने कालपासूनच मी वाट बघत हाेताे. आज ताे दिवस उजाडला. सर्व शिक्षक भेटले, मित्र भेटले मज्जा आली. काेराेनाबाबतचे नियम शाळेत पाळले जात हाेते.- हर्ष पाटील, विद्यार्थी

पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळत होता. पहिल्याच दिवशी ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. पालकांचे संमती पत्रक ही घेतले गेले. - सुप्रिया पाटील, नागाव हायस्कूल

पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह चांगलाच हाेता. काेराेनाचे सर्व नियम पाळण्यात येत आहेत. मुलांनाही काेराेबाबत माहिती आहे. त्यामुळे तेही जागरुक आहेत. अद्यापही काही पालकांनी संमतीपत्रे दिलेली नाहीत-  संध्या पाटील, चिंचाेटी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा