शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती; चाकरमान्यांची बसस्थानकात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 11:01 PM

पोलादपूरमधून १८ जादा गाड्या

पोलादपूर : गणेशोत्सवासाठी आलेले कोकणवासीय चाकरमानी गौरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर परतीच्या मार्गाला लागले असून पोलादपूर स्थानकातून १८ जादा एसटी गाड्यांसह काही खासगी गाड्या विविध मार्गावर मार्गस्थ झाल्या आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तसेच सोमवारी कामावर हजर होण्यासाठी अनेक चाकरमानी रविवारी सकाळपासून परतीच्या मार्गाला लागल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच कशेडी घाट परिसरातील भोगाव हद्दीत प्रवास संथ गतीने करावा लागत असून त्यातच पर्याय रस्ते उपलब्ध नसल्याने वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

राज्यातील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावात दाखल होत असतात. पाच दिवसांचे गणपती आणि गौरी विसर्जनानंतर आता या चाकरमान्यांनी मुंबईचा परतीचा रस्ता धरला आहे. खासगी गाड्यांसह एसटी बसेसने मुंबई, ठाणे, नालासोपारा, भिवंडी, कल्याण, भार्इंदर आदींसह सुरत, भडोच, बारडोल, अहमदाबाद आदी ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून मार्गस्थ झाले आहेत. पुणे पिंपरी चिंचवडकडे जाणारे प्रवासी मुंबई -गोवा महामार्ग माणगाव निजामपूर ताम्हानी तर काही प्रवासी वाकण पाली खोपीली मार्गे जात आहेत तर पोलादपूरकर महाबळेश्वर मार्गे रवाना होत आहेत. खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, गुहागर आदी भागातील चाकरमानी महाबळेश्वरसह कोयना मार्गे पुणे, पिंपरीकडे रवाना होत आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पोलादपूर स्थानकातून १८ जादा गाड्या मुंबई, बोरीवली,ठाणे, नालासोपारा, पुणे आदी ठिकाणी सोडण्यात आल्या तर काही प्रवाशांनी खासगी टेम्पोट्रॅव्हल,लक्झरीने प्रवास करण्यासाठी रांग लावल्याचे चित्र पोलादपूर बसस्थानाकसह महामार्गावरील खासगी वाहतूक व्यावसायिकांकडे दिसून आले.पुणेकरांना करावा लागतोय लांबचा प्रवासभोर घाट बंद असल्याने ताम्हानी मार्गासह महाबळेश्वर मार्गे पुण्यामध्ये जावे लागत आहे त्यातच ताम्हानी घाट मार्ग खड्डेमय तसेच पुणे जिल्हा हद्दीत नवीन मार्गाचे काम सुरू असल्याने सदरचा प्रवास सुखाचा नसल्याने शरीराची हाडे खिळखिळी करणारा व वेळ खाणारा बनला आहे तर पोलादपूर सह खेड दापोलीकर महाबळेश्वर वाई सुरुर या राज्य मार्गावरून सुरुर फाटापर्यंत जात आहेत. पुढे पुणे- बंगळुरू महामार्गाने पुण्याकडे मार्गस्थ होत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी काम सुरू असल्याने वाहतूककोंडी सातत्याने असते त्यातच टोल नाक्यावर रांगा लागत असल्याने पाच सहा तासांचा प्रवास सात आठ तास लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. महामार्गाप्रमाणे शासनाने पर्यायी मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे त्याचप्र्रमाणे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे गरजेचे आहे. या दोन्ही मार्गिकांप्रमाणे कशेडी घाट, आंबेनळी घाट, ताम्हानी घाट या प्रमुख घाट मार्गाना पर्याय निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहेखासगी वाहनचालकांची चंगळअनेक खासगी वाहनचालक मालक गर्दीचा फायदा उठवत प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत तर काही वाहनचालक मालक सरसकट भाडे ठरवून मार्गस्थ होत आहेत. गुजरात राज्यात जाण्यासाठी महाड आगाराची एसटी सेवा नसल्याने गुजरात राज्यातील बस सेवेवर प्रवाशांना अवलंबून रहावे लागत आहे. पोलादपूर स्थानकातून अहमदाबाद तर महाड आगारातून सुरत गुजरात मंडळाच्या बसेस सोडण्यात येत आहे. पोलादपूर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यास जागा नसल्याने अनेक बसेस महामार्गावर उभ्या राहिल्याचे चित्र दिसून आले आहे तीच परिस्थिती महाड आगाराची झाली होती.मुंबईकडे जाणाऱ्यांचे हालपेण : गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आले होते. या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी गर्दी दिसून येत आहे. कोकणातून मुंबईकडे एसटी बसेस गाड्यांना पूर्णपणे गर्दी असल्याने वडखळ, रामवाडी, पेण आदि ठिकाणाहून मुंबईकडे जाणाºया प्रवाशांचे हाल होत आहे. गाड्या तुडुंब भरून जात आहेत. गाडीत पाय ठेवण्यासाठी जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईकडे जाणारी गाडी आली की गाडीत चढण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्याचे दिसून येत आहे. एसटी बस गाड्यांना गर्दी असल्याने खासगी बसेस, सुमो, जीप आदि वाहनांचा आधार घेण्यात येत असून लोकांच्या अडचणीचा व चालून आलेल्या संधीचा फायदा या खासगी वाहतूकदारांनी घेतला आहे.

टॅग्स :state transportएसटी