शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:29 IST

बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले.

 कर्जत : सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा सुरू असून शनिवार - रविवार विकेंड लाॅकडाऊन असतो. त्यामुळे शुक्रवारी आणि सोमवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. आज सोमवारी या गर्दीने कर्जत बाजारपेठेत परिसीमा गाठली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी बहुतांश जण मास्कचा वापर करताना दिसले. बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले. पहिले काही दिवस पोलीस मैदानात सर्व जणांनी आपली दुकाने थाटली मात्र आता हळूहळू पुन्हा बाजारपेठेत फेरीवाले व भाजी फळ विक्रेते बसू लागल्याने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी सात ते सकाळी ११ ही वेळ ग्राहक व व्यापारी या दोघांसाठी गैरसोयीची आहे. कारण सकाळी सात वाजता खरेदीसाठी जास्त कुणी येत नाही आणि या दिलेल्या चार तासांपैकी दीड - दोन तास दुकान उघडून लावणे व नंतर बंद करताना आवरणे यासाठी जातात. ग्राहक खरेदीसाठी नऊसव्वा नऊपासून येतात कारण नगरपरिषदेची पाणीपुरवठा करण्याची वेळ सुद्धा त्या दरम्यान असते. त्यामुळे आधीचे दोन तास वाया जातात व उरलेल्या दोन तासात ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत होते. या चार तासात भाजी व फळ विक्रेत्यांची पूर्ण भाजी किंवा फळे विकली जात नाहीत. पोलीस ठाण्यासमोरच मैदानावर ते विक्री करीत असल्याने अकराच्या ठोक्याला त्यांना दुकाने बंद करावी लागतात त्यामुळे त्यांची निम्म्याहून अधिक भाजी व फळे शिल्लक राहतात व दररोज नुकसान होते. काही ग्राहक चारचाकी गाड्या दुकानासमोर बिनधास्तपणे लावून खरेदी करीत असल्याने नाहक वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. दुचाकी तर मोठ्या संख्येने बाजारपेठेत आणण्यात येतात. त्यामुळेही बाजारपेठेत गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. त्यातच कर्जत शहरातील काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे थोडीशी पंचाईत होते. त्यामुळे सकाळची सात ते अकरा ही वेळ बदलून दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवल्यास गर्दीला नक्कीच आळा बसेल.

बोर्ली-मांडला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यात व जिल्ह्यात करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर आज सोमवारी सकाळी बोर्ली-मांडला, नांदगाव, मजगांव परिसरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

जिल्ह्यातकोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाच्यावतीने निर्बंध लागू जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच १५ मेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आला असून वीकेंड लाॅकडाऊनआधी व नंतर बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची लगबग दिसून येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस