शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

By निखिल म्हात्रे | Updated: March 29, 2024 11:28 IST

पाणवठे स्वच्छ करून केली सुविधा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पाणीटंचाईत केवळ माणसेच होरपळतात असे नाही, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात आणि कोणाची तरी शिकार बनतात. त्यामुळे प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळावे, यासाठी वन विभागाने पुढाकार घेत जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधले आहेत. हे स्रोत स्वच्छ करून जंगली प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेत त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. जंगल भागातील पाणवठे स्वच्छ करून पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा स्रोत खुला करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल यांना दिले. जिल्ह्यात तातडीने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबागसह सुधागड व अन्य तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे स्रोत शोधले. ते स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

  • प्राणीप्रेमींचाही उपक्रमाला पाठिंबा

उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून प्राणीप्रेमींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जंगल भागातील पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटल्यात जमा आहे.

जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्रोत शोधून ते स्वच्छ करण्यात आले आहेत. यातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही चांगले सहकार्य केले आहे.- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागalibaugअलिबागWaterपाणीwildlifeवन्यजीव