शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

By निखिल म्हात्रे | Updated: March 29, 2024 11:28 IST

पाणवठे स्वच्छ करून केली सुविधा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पाणीटंचाईत केवळ माणसेच होरपळतात असे नाही, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात आणि कोणाची तरी शिकार बनतात. त्यामुळे प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळावे, यासाठी वन विभागाने पुढाकार घेत जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधले आहेत. हे स्रोत स्वच्छ करून जंगली प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेत त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. जंगल भागातील पाणवठे स्वच्छ करून पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा स्रोत खुला करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल यांना दिले. जिल्ह्यात तातडीने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबागसह सुधागड व अन्य तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे स्रोत शोधले. ते स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

  • प्राणीप्रेमींचाही उपक्रमाला पाठिंबा

उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून प्राणीप्रेमींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जंगल भागातील पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटल्यात जमा आहे.

जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्रोत शोधून ते स्वच्छ करण्यात आले आहेत. यातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही चांगले सहकार्य केले आहे.- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागalibaugअलिबागWaterपाणीwildlifeवन्यजीव