शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 23:30 IST

सभांमधून स्थानिक मुद्दे गायब, छुप्या प्रचारावर राहणार उमेदवारांचा भर

- आविष्कार देसाई 

अलिबाग : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मशाली आता थंड झाल्या. दिग्गजांच्या प्रचारसभांमधून तोफांना बत्ती दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारसभांमधून स्थानिक विकासाचे मुद्दे हरवल्याचे दिसून आले. एकमेकांच्या वरचढ कोण हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. प्रचाराची सांगता झाल्याने उमेदवार आता छुप्या प्रचारावर भर देणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच मतदारसंघात साम, दाम, दंड भेद यावर भर देण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाचे लक्ष राहणार आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सातही विधानसभांमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे. आपल्याच उमेदवाराला विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगलीच कंबर कसली होती. युती विरोधात आघाडी, असाच सामना रंगणार आहे. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवजड उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दिग्गजांनी एकमेकांवर आसूड ओढले. त्यामुळे वातावरणात चांगलीच रंगत आली. दिग्गजांच्या सभांनी गर्दी खेचली; परंतु त्यातून मतदारांची मन जिंकली का? हे निकाल लागल्यावरच कळणार आहे.

मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या. मात्र, त्या प्रचारसभांमधून एकमेकांची उणीधुणी काढण्यात आल्याने स्थानिक विकासाचे प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूला पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीची सोडवणूक कोणता उमेदवार करणार, याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर सांशकतेचे भाव असल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने बरसून विविध सभा, रॅलींवर परिणाम केला. त्यामुळे वक्त्यांची भाषणे मनसोक्त ऐकता न आल्याने काही ठिकाणी भ्रमनिरास झाल्याचे चित्र होते.

विधानसभा मतदारसंघांमधील महत्त्वाच्या लढती

अलिबाग, उरण या मतदारसंघामध्ये शेकापची टक्कर शिवसेनेच्या उमेदवारांसोबत आहे, तर पेण आणि पनवेलमध्ये भाजपसोबत दोन हात करावे लागणार आहेत. कर्जत आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. तसेच महाड मतदारसंघामध्ये काँग्रेसलाही शिवसेनेच्याच उमेदवाराचा सामना करावा लागत आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

१श्रीवर्धन मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने खासदार तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

२अलिबागमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांना निवडणुकीत जिंकून आणायचे असल्याने त्यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण आहे.

महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांची लढाई काँग्रेसचे माणिक जगताप यांच्यासोबत आहे. जगताप यांच्यासाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच आहे. उरणममध्ये भाजपचे बंडखोर महेश बालदी यांच्यामुळे शिवसेनेचे मनोहर भोईर यांना अडचण झाल्याने ते अडचणीवर कशी मात करतात, हे लवकरच कळणार आहे. त्याच वेळी शेकापचे विवेक पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस