शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 23:30 IST

सभांमधून स्थानिक मुद्दे गायब, छुप्या प्रचारावर राहणार उमेदवारांचा भर

- आविष्कार देसाई 

अलिबाग : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मशाली आता थंड झाल्या. दिग्गजांच्या प्रचारसभांमधून तोफांना बत्ती दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारसभांमधून स्थानिक विकासाचे मुद्दे हरवल्याचे दिसून आले. एकमेकांच्या वरचढ कोण हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. प्रचाराची सांगता झाल्याने उमेदवार आता छुप्या प्रचारावर भर देणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच मतदारसंघात साम, दाम, दंड भेद यावर भर देण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाचे लक्ष राहणार आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सातही विधानसभांमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे. आपल्याच उमेदवाराला विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगलीच कंबर कसली होती. युती विरोधात आघाडी, असाच सामना रंगणार आहे. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवजड उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दिग्गजांनी एकमेकांवर आसूड ओढले. त्यामुळे वातावरणात चांगलीच रंगत आली. दिग्गजांच्या सभांनी गर्दी खेचली; परंतु त्यातून मतदारांची मन जिंकली का? हे निकाल लागल्यावरच कळणार आहे.

मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या. मात्र, त्या प्रचारसभांमधून एकमेकांची उणीधुणी काढण्यात आल्याने स्थानिक विकासाचे प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूला पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीची सोडवणूक कोणता उमेदवार करणार, याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर सांशकतेचे भाव असल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने बरसून विविध सभा, रॅलींवर परिणाम केला. त्यामुळे वक्त्यांची भाषणे मनसोक्त ऐकता न आल्याने काही ठिकाणी भ्रमनिरास झाल्याचे चित्र होते.

विधानसभा मतदारसंघांमधील महत्त्वाच्या लढती

अलिबाग, उरण या मतदारसंघामध्ये शेकापची टक्कर शिवसेनेच्या उमेदवारांसोबत आहे, तर पेण आणि पनवेलमध्ये भाजपसोबत दोन हात करावे लागणार आहेत. कर्जत आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. तसेच महाड मतदारसंघामध्ये काँग्रेसलाही शिवसेनेच्याच उमेदवाराचा सामना करावा लागत आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

१श्रीवर्धन मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने खासदार तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

२अलिबागमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांना निवडणुकीत जिंकून आणायचे असल्याने त्यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण आहे.

महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांची लढाई काँग्रेसचे माणिक जगताप यांच्यासोबत आहे. जगताप यांच्यासाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच आहे. उरणममध्ये भाजपचे बंडखोर महेश बालदी यांच्यामुळे शिवसेनेचे मनोहर भोईर यांना अडचण झाल्याने ते अडचणीवर कशी मात करतात, हे लवकरच कळणार आहे. त्याच वेळी शेकापचे विवेक पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस