शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाण्यामुळे रस्त्याची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:30 IST

शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देविठोबा चौकातील प्रकार : दुरूस्तीकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे. नव्हे पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेकांना गंभीर दुखापती होत आहे. असे असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.विठोबा चौकाकडून नागपूरकडे जाणाºया अत्यंत गजबजलेला तथा वाहतुकीचा रस्ता शहरात प्रवेश करतो. फीदा हुसैन पेट्रोल पंपकडून विठोबा चौकाकडे येताना प्रस्तूत प्रतिनिधीने खड्ड्यांची प्रत्यक्ष गणनाच केली. यात खड्डे विठोबा चौक ते पेट्रोलपंप दरम्यान रस्त्यावर लहान-मोठे ११३ खड्डे दिसून आले. या रस्त्याची दर्जेदार दुरूस्ती करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगर परिषद प्रशासनाने अद्याप दाखविली नाही. शहरातील अनेक नागरिकांनी मागणी करूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पाऊस आल्यास या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असून दुचाकी धारकांची फटफजीती होते. खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. विशेषत: महिला व वृद्ध दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावर इतके अधिक खड्डे आहे की, रस्ताच खड्ड्यात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. खड्डे चुकवून चालण्याच्या नादात अपघात होतात. या रस्त्याचे नव्याने बांधकाम होणार असल्याची माहिती आहे. असे असले तरी तोपर्यंत तात्पूरती दुरूस्ती करून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.मुरूमावरून वाहने घसरून होत आहेत अपघाततुकडोजी चौक ते विठोबा चौक दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांत मुरूम टाकण्यात आला आहे. यात दगडच अधिक असल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. खड्डे भरताना मुरूम पे्रसही करण्यात आलेला नाही. यापुर्वी हेच खड्डे गिट्टीच्या बारीक चुरीने बुजविण्यात आले होते; पण पहिल्याच पावसातच चुरी वाहून गेली. यानंतर थोडी जाड चुरी खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आली; पण ती निरुपयोगी ठरली आहे. खड्डे मात्र जैसे थे झाले आहेत.आता पालिकेने तिसरा प्रयोग म्हणून मुरूम व दगडाने खड्डे बुजविले आहे. त्या मुरूमाच्या दगडांवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. शिवाय रस्त्यांची अवस्था पाहून पालिकेवर रोष व्यक्त करीत आहेत. नगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.