शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:34 IST

शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे.

माणगाव : शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. रायगड लोकसभेमध्ये वादळ निर्माण झाले असून, या वादळामध्ये धनुष्यबाणाचे किती तुकडे होतील व कमळाबाईच्या किती पाकळ्या होतील, हे चित्र येथील जनतेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के ले.माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे रायगड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,काँग्रेस, शेकाप, पीआरपी (कवाडे गट), आरपीआय (गवई गट), मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सभेसाठी मुंडे गुरूवारी आले होते. धनंजय मुंडे म्हणाले की, २०१४ मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता २०१९ मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे. मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील निवडणुकीमध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत होते; परंतु आता अच्छे दिनाची चेष्टा गावांमध्ये, शहरांमध्ये होऊ लागली आहे.नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, अच्छे दिन बिच्छे दिन कुछ नही होता, उसको महसूस करना होता है, अशा प्रकारे हे जनतेची फसवणूक करीत आहेत.उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते म्हणाले की, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मुख्यमंत्री झाला नाहीत तरी तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली याची इडीमार्फत चौकशी करण्यात येईल. सुनील तटकरेंना बदनाम करण्याचा कट यांनी केला आहे. अनंत गीते हे केंद्रात विविध पदांवर असताना काम करण्याची संधी मिळाली होती; परंतु त्यांच्याकडून विकासाचे प्रश्न सुटले नाहीत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून, यांचा संबंध थेट मातोश्रीही आहे. १५ वर्षांच्या नवसाने सरकार आले आणि मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकार गेले, अशी वेळ यांच्यावर आली आहे.देशाच्या लोकशाहीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. कोकणची जनता सुज्ञ असून, तटकरे हे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतीलच असा विश्वास व्यक्त केला.>भाजप व शिवसेनेवर टीकापाच वर्षांत मोदी सरकारने जनतेची लूट केली. नीरव मोदी २४ हजार कोटी, ललित मोदी आठ हजार कोटी, चोकसी, विजय मल्ल्या हे पळून गेले, तेव्हा देशाचे चौकीदार हेच होते. राफेल घोटाळा, व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटी खाल्ले, याचे उत्तर देशाला द्यावेच लागणार आहे. पहारेकरी व चौकीदार हे दोघेही चोर असल्याटी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड