शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना, भाजपला मत म्हणजे देशातील हुकूमशाहीला मत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:34 IST

शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे.

माणगाव : शिवसेना व भाजपला मत देणे म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. रायगड लोकसभेमध्ये वादळ निर्माण झाले असून, या वादळामध्ये धनुष्यबाणाचे किती तुकडे होतील व कमळाबाईच्या किती पाकळ्या होतील, हे चित्र येथील जनतेला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी के ले.माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे रायगड लोकसभा निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,काँग्रेस, शेकाप, पीआरपी (कवाडे गट), आरपीआय (गवई गट), मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या सभेसाठी मुंडे गुरूवारी आले होते. धनंजय मुंडे म्हणाले की, २०१४ मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता २०१९ मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे. मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील निवडणुकीमध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत होते; परंतु आता अच्छे दिनाची चेष्टा गावांमध्ये, शहरांमध्ये होऊ लागली आहे.नितीन गडकरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, अच्छे दिन बिच्छे दिन कुछ नही होता, उसको महसूस करना होता है, अशा प्रकारे हे जनतेची फसवणूक करीत आहेत.उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते म्हणाले की, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, मुख्यमंत्री झाला नाहीत तरी तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली याची इडीमार्फत चौकशी करण्यात येईल. सुनील तटकरेंना बदनाम करण्याचा कट यांनी केला आहे. अनंत गीते हे केंद्रात विविध पदांवर असताना काम करण्याची संधी मिळाली होती; परंतु त्यांच्याकडून विकासाचे प्रश्न सुटले नाहीत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून, यांचा संबंध थेट मातोश्रीही आहे. १५ वर्षांच्या नवसाने सरकार आले आणि मंत्र्यांच्या घोटाळ्याने सरकार गेले, अशी वेळ यांच्यावर आली आहे.देशाच्या लोकशाहीसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. कोकणची जनता सुज्ञ असून, तटकरे हे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतीलच असा विश्वास व्यक्त केला.>भाजप व शिवसेनेवर टीकापाच वर्षांत मोदी सरकारने जनतेची लूट केली. नीरव मोदी २४ हजार कोटी, ललित मोदी आठ हजार कोटी, चोकसी, विजय मल्ल्या हे पळून गेले, तेव्हा देशाचे चौकीदार हेच होते. राफेल घोटाळा, व्यापमं घोटाळा, महाराष्ट्रातील १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटी खाल्ले, याचे उत्तर देशाला द्यावेच लागणार आहे. पहारेकरी व चौकीदार हे दोघेही चोर असल्याटी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड