शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सुनियोजित पाणीपुरवठ्याचा भेकरेवाडी पॅटर्न अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:32 IST

झऱ्याच्या आधारे चोवीस तास पुरवठा; स्थानिकांनी स्वखर्चातून टाकली जलवाहिनी

- वैभव गायकरपनवेल : उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागासह शहरातही तीव्र पाणीटंचाई जाणवू लागते. धरणे, विहिरी आदी ठिकाणच्या पाण्याची पातळी खालावल्याने हे परिणाम दिसू लागतात. अशा वेळी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते. मात्र पनवेल तालुक्यातील भेकरेवाडी आदिवासी पाडा या सर्व गोष्टींना अपवाद आहे. ग्रामस्थांनी सुमारे चार किलोमीटर लांबून नैसर्गिक झऱ्यातून नळपाणी योजना सुरू केली आहे.मागील चार वर्षात आदिवासी पाड्यात एकदाही पाणीटंचाई जाणवली नाही. पनवेल तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीत डोंगर कपारीत भेकरवाडी हा आदिवासी पाडा वसला आहे. पाड्यात पाणीपुरवठ्याचे कोणतेच साधन नसल्याने येथील रहिवासी बाबू निरगुडा, संतोष हवाली, भालचंद्र हवाली या तिघांनी प्रत्येकी ५ हजार रु पये काढून पाड्यापासून चार किमी अंतरावर असलेल्या राजप्रधान परिसरातील नैसर्गिक झºयातून पाणी आणण्याचे नियोजन केले. नैसर्गिक झºयात बंदिस्त टाकी बांधून त्याठिकाणी जलवाहिनी जोडली आहे. हा झरा उंचावर असल्याने जोडलेल्या जलवाहिनीद्वारे थेट पाड्यात मधोमध तीन सिंटेक्सच्या टाकीमध्ये पाणी साठवले जाते. एकूण १२ हजार लीटरच्या तीन टाक्यांद्वारे संपूर्ण पाड्याला चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. याकरिता पाच ठिकाणी सार्वजनिक नळ (स्टॅन्ड पोस्ट) उभारले आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रि येत इलेक्ट्रिक उपकरणाचा उपयोग न करता यंत्रणा कार्यान्वित केली आहे.भेकरेवाडी आदिवासी वाडीत एकूण ४२ घरे आहेत. २५0 ते ३00 च्या आसपास येथील लोकवस्ती आहे. अनेकांनी येथील पाणी आपल्या घरापर्यंत घेऊन गेले आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी काही नियम निश्चित केले आहेत.पाण्याची टाकी साफ करायची जबाबदारी देखील ग्रामस्थांनी आपापसात वाटून घेतली आहे. प्रत्येक १५ दिवसांनी टाकी स्वच्छ केली जाते. वाडीला चोवीस तास पाणीपुरवठा मिळत असल्याने महिलावर्गामध्ये आनंद आहे. यापूर्वी डोंगर कपारीत पाण्यासाठी फिरावे लागत असे.उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट आहे. अशा परिस्थितीत घरांपर्यंत चोवीस तास पाणी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सीताबाई पांडुरंग पारधी सांगतात.भेकरेवाडीतील पाण्याची भीषण परिस्थिती पाहता, आम्ही झºयाचे पाणी उपयोगात आणण्याचे नियोजन केले. झºयाच्या ठिकाणी टाकी बांधून त्याठिकाणी प्लॅस्टिकची जलवाहिनी जोडली. झरा उंचीवर असल्याने पाणी उच्चदाबाने जलवाहिनीद्वारे वाहू लागले आणि पाड्याचा पाणीप्रश्न सुटला.- बाबू निरगुडा, ग्रामस्थ, भेकरेवाडीखारघरसारख्या मेट्रोसिटीतही अनेकदा पाण्याची समस्या भेडसावते. येथील धामोळे आदिवासी पाड्यात अद्याप टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेषत: येथील पांडवकडा धबधबा राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र या धबधब्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावात अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. भेकरेवाडीसारखी यंत्रणा याठिकाणी देखील राबविण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Waterपाणी