शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'साध्वी प्रज्ञा सिंह जेलबाहेर आल्या कशा?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 07:15 IST

जयंत पाटील यांची घणाघाती टीका

मुरुड : राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार जेव्हा महाराष्ट्रात होते, तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह या जेलमध्ये होत्या; परंतु भाजप व शिवसेनेची सत्ता येताच त्या जेलबाहेर येतात. त्या जेलबाहेर कशा आल्या, त्यांना मुक्त कोणी केले याचा खुलासा राज्य सरकारने करणे खूप आवश्यक आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीस भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून खासदारकीचे तिकीट देऊन या गोष्टीचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री करीत असतील तर या राज्यकर्त्यांची नैतिकता लयास गेली आहे. संसदेत भगवे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारणाºया विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या या धोरणाला जोरदार विरोध करून मुंबईचे संरक्षण करीत असताना हेमंत करकरे हे शहीद झाले होते.त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण पोलीस दलाचा अवमान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी करून सुद्धा समर्थन करणाऱ्या भाजपला लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुरुड शहराच्या जाहीर सभेत केले.या वेळी जयंत पाटील म्हणाले की, २८ टक्के जीएसटीमुळे संपूर्ण व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले असून जेव्हा मोदी सत्तेच्या बाहेर होते तेव्हा याच जीएसटीला विरोध केला होता. आमच्या काळात आम्ही व्हॅल्यू एडीट टॅक्सला सहमती दिली होती. हा टॅक्स व्यापारी वर्गाला परवडत होता; परंतु काही तरी वेगळे करून दाखवण्याच्या नादात एकतर्फी निर्णय घेऊन जीएसटी अमलात आणून संपूर्ण व्यापारी वर्गाची नाराजी ओढवून घेतली आहे. या महाराष्ट्रामधून शिवसेनेचे खासदार सर्वात कमी निवडून येणार आहेत. जे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेतृत्व असताना जे बोलत होते तेच करीत होते; परंतु उद्धव ठाकरे आपली सारखी भूमिका बदलत आहेत. यामुळे सामान्य शिवसैनिक बुचकळ्यात सापडला असून तो शिवसेनेपासून दुरावला आहे.त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात कमी खासदार निवडून येतील असे भाकीत त्यांनी केले. आमचे सरकार जर केंद्रात आले तर तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देऊ.२०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत भारत देशावर ३१ लाख कोटी रु पयांचे कर्ज चढले असून मी या सभेद्वारे मोदींना प्रश्न विचारू इच्छितो की हे ३१ लाख गेले कुठे? कशावर खर्च करण्यात आले याचा देशातील जनतेला हिशोब द्या. या सरकारने मेक इन इंडिया नावाचा कार्यक्र म राबवला; परंतु याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.भाजपचे सरकार फसवे असून खरी माहिती लोकांपुढे आणत नाही. या देशातून कर्ज बुडवणाºयांची संख्या ३६ असून फक्त प्रसार माध्यमांसमोर विजय मल्ल्या, नीरव मोदी यांचीच नावे दाखवली जात आहेत;परंतु सुप्रीम कोर्टात अंमलबजावणी संचालनालय यांनी ३६ लोकांनी बँकांना डुबवल्याचा अहवाल सादर केला आहे. अफरातफर करून लोक विदेशात पळून जात असतील तर या देशाचा चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान काय करीत आहेत असा प्रश्न या वेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस आयच्या महिला अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष सुभाष महाडिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरJayant Patilजयंत पाटील