शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

नाबार्डची २७८१ कोटींची पत योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:55 IST

अलिबाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या सन २०१८-१९ या वर्षाकरिताची रायगड जिल्ह्यासाठी तयार केलेल्या ‘संभाव्यतायुक्त पत योजना २०१८-१९’ चे प्रकाशन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बुधवारी जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत झाले.

जयंत धुळपअलिबाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या सन २०१८-१९ या वर्षाकरिताची रायगड जिल्ह्यासाठी तयार केलेल्या ‘संभाव्यतायुक्त पत योजना २०१८-१९’ चे प्रकाशन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बुधवारी जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत झाले. या पतयोजनेत २७८१ कोटी ५१ लाख ७० हजार रु पयांच्या या जिल्हा पतयोजनेत कृषी क्षेत्रात पीक कर्ज, पीक उत्पन्न, साठवण आणि पणन, तसेच कृषी संलग्न उपक्रम, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्मिती, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्र, शिक्षण, गृहनिर्माण, अपारंपरिक ऊर्जा ही प्राधान्यक्र माची क्षेत्रे ठरविण्यात आली असल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा समन्वयक एस. एस. राघवन यांनी या वेळी दिली.शासकीय योजनांतर्गत स्वयंरोजगार स्थापन करू इच्छिणाºया आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणाºया क्षेत्राला बँकांनी पतपुरवठा वाढवावा. याचा संबंध थेट गरिबी निर्मूलनाशी असल्याने याकडे बँक अधिकाºयांनी सकारात्मकतेने पाहावे. शासन योजनेंतर्गत अर्थसाहाय्य प्रकरणे येत्या १० जानेवारी २०१८पर्यंत तर स्वयंसाहाय्यता बचतगटांना करावयाच्या अर्थसाहाय्याची प्रकरणे ७ जानेवारी २०१८पर्यंत निकाली काढावीत, असे निर्देश या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाºयांना दिले आहेत. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी बी. एम. कोरी, जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. भोर, नाबार्डचे एस. एस. राघवन, जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर ए. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम. एन. देवराज, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, स्टेट बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी पी. ए. कुलकर्णी, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य व्यवस्थापक एम. एम. वर्तक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक दयानंद कुंभार तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यातील बँकांचा शासनपुरस्कृत योजनांचा अर्थसाहाय्य विषयक आढावा, तर पीकविमा योजना, पीककर्ज यासाठी सर्व बँकांना दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यात आला. शासकीय योजनांतर्गत उभारण्यात येणाºया स्वयंरोजगार प्रकल्पांच्या अर्थसाहाय्याचाही आढावा घेण्यात आला.गेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार बँकांनी स्वयंप्रेरणेने गावकºयांमध्ये अर्थसाहाय्य योजनांबाबत जागृती करण्यासाठी शिबिरे घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचाही आढावा या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला.>शेतीपूरक व स्थानिक उद्योगांना प्राधान्यजिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी अर्थसाहाय्य करून रोजगाराला चालना मिळणार आहे, अशा ठिकाणी अर्थसाहाय्य त्वरित करावे. त्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करून संबंधित अर्जदाराला उत्तर द्यावे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात ग्रामप्रवर्तकांनी गावातील रोजगारनिर्मितीसाठी गावातील काही लोकांना शेतीपूरक व स्थानिक उद्योगांसाठी प्रवृत्त केले आहे. अशा प्रकरणांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तीन लाख चार हजार २५४ इतक्या लोकांचे विमा खाते उघडण्यात आले आहे. तर जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एक लाख तीन हजार ७८ खाती उघडले आहेत.