शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले

By निखिल म्हात्रे | Updated: November 20, 2023 16:19 IST

400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - चालू हंगामात उत्तम भातशेती आलेल्या बळीराजाच्या भातपिकावर पावसाने आक्रमण केल्यानंतर पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा पार खचून गेला आहे. आडवी झालेल्या भातशेतीमध्ये भात पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा तूर्त हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे भात कापणीसाठी लागणारा मजुरदार मिळेनासा झाल्याने चढ्या भावाने म्हणजेच 400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.

पावसामुळे कापणीचा हंगाम सर्वत्र एकाच वेळी आल्याने मजुरांनी आपल्या मजुरीत वाढ केली असून, वाढत जाणाऱ्या मजुरीचा दर शेतकऱ्यांसाठी मारक ठरु लागला आहे. 400 ते 600 रु. मजुरी देवून कामगार घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आपली शेती नकोशी झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. भाताच्या उत्पन्नापेक्षा मजुरी अधिक द्यावी लागत असून, शेतकरी हवालदील झाला आहे.

यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उत्तम साथ दिल्याने बळीराजाच्या शेतात चांगल्या प्रकारे भाताची कणसे तयार झाली आणि सोन्यासारखी भात शेती पिवळी होऊ लागली. उत्तम भातशेती बघुन बळीराजाही आनंदीत दिसत होता. आपल्याला भरघोस भात पिकणार या आशेवर शेतकरी समाधान व्यक्त करत होता. मात्र, चांगल्या प्रकारे आलेल्या भातशेतीवर पावसाने आक्रमण केल्यास हाती आलेले भातही पाऊस हिरावून घेणार की, काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत होती.

या पडलेल्या भातशेतकडे पाहून शेतकरी मात्र गहिवरुन जात आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पिक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करुन भरघोस आलेले भाताचे पिक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी कि नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करु लागला आहे. एकीकडे शेतात उत्तम प्रकारे आलेले भात, वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसान झाले तर दुसरीकडे मजुरदारांनी वाढत्या मजुरीची संधी न सोडता मजुरीवाढीसाठी अडून बसलेल्या मजुरदारांना विनंत्या करुन कोणी 400, कोणी 500 तर कोणी 600 रुपये मजुरीचा दर ठरवून त्याचबरोबर मजुरांना उत्तम प्रकारे जेवण, दोन वेळचा चहा-नाश्ता तसेच येण्या-जाण्याचा उतार खर्च असा सगळा थाट पाहता यावर्षी शेतकऱ्यांपेक्षा मजुरदारांची दिवाळी भरभराटीची चालली असल्याचे बोलले जात आहे.

असा सगळा थाट-माट मिळत असल्याने आदिवासी बांधव व अन्य मजुरदार पेणच्या कामागार नाक्यावर आनंदाने कामावर जाण्यासाठी हजर असतात. या कामगारांना नेण्यासाठी स. 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्व शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजुरदार मिळेनासा झाला असल्याने मजुरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी