शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

भात कापणीचा दर वाढल्याने बळीराजा हवालदिल, भातपीकाचे उत्पादन वाढले

By निखिल म्हात्रे | Updated: November 20, 2023 16:19 IST

400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - चालू हंगामात उत्तम भातशेती आलेल्या बळीराजाच्या भातपिकावर पावसाने आक्रमण केल्यानंतर पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा पार खचून गेला आहे. आडवी झालेल्या भातशेतीमध्ये भात पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा तूर्त हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे भात कापणीसाठी लागणारा मजुरदार मिळेनासा झाल्याने चढ्या भावाने म्हणजेच 400 ते 500 रुपयांची रक्कम मजुरांना भात कापणीसाठी घ्यावे लागत आहे.

पावसामुळे कापणीचा हंगाम सर्वत्र एकाच वेळी आल्याने मजुरांनी आपल्या मजुरीत वाढ केली असून, वाढत जाणाऱ्या मजुरीचा दर शेतकऱ्यांसाठी मारक ठरु लागला आहे. 400 ते 600 रु. मजुरी देवून कामगार घ्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आपली शेती नकोशी झाली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. भाताच्या उत्पन्नापेक्षा मजुरी अधिक द्यावी लागत असून, शेतकरी हवालदील झाला आहे.

यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उत्तम साथ दिल्याने बळीराजाच्या शेतात चांगल्या प्रकारे भाताची कणसे तयार झाली आणि सोन्यासारखी भात शेती पिवळी होऊ लागली. उत्तम भातशेती बघुन बळीराजाही आनंदीत दिसत होता. आपल्याला भरघोस भात पिकणार या आशेवर शेतकरी समाधान व्यक्त करत होता. मात्र, चांगल्या प्रकारे आलेल्या भातशेतीवर पावसाने आक्रमण केल्यास हाती आलेले भातही पाऊस हिरावून घेणार की, काय अशी भिती शेतकऱ्यांना वाटत होती.

या पडलेल्या भातशेतकडे पाहून शेतकरी मात्र गहिवरुन जात आहे. त्यामुळे भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. हाती आलेले पिक पावसाने हिरावून घेतल्याने वर्षभर मेहनत करुन भरघोस आलेले भाताचे पिक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पिकवावी कि नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करु लागला आहे. एकीकडे शेतात उत्तम प्रकारे आलेले भात, वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसान झाले तर दुसरीकडे मजुरदारांनी वाढत्या मजुरीची संधी न सोडता मजुरीवाढीसाठी अडून बसलेल्या मजुरदारांना विनंत्या करुन कोणी 400, कोणी 500 तर कोणी 600 रुपये मजुरीचा दर ठरवून त्याचबरोबर मजुरांना उत्तम प्रकारे जेवण, दोन वेळचा चहा-नाश्ता तसेच येण्या-जाण्याचा उतार खर्च असा सगळा थाट पाहता यावर्षी शेतकऱ्यांपेक्षा मजुरदारांची दिवाळी भरभराटीची चालली असल्याचे बोलले जात आहे.

असा सगळा थाट-माट मिळत असल्याने आदिवासी बांधव व अन्य मजुरदार पेणच्या कामागार नाक्यावर आनंदाने कामावर जाण्यासाठी हजर असतात. या कामगारांना नेण्यासाठी स. 5 वाजल्यापासून शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्व शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजुरदार मिळेनासा झाला असल्याने मजुरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी