शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 03:12 IST

उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. सध्या उरण आणि पेण याच मतदारसंघामध्ये या ग्रहणाची छाया पडली असली, तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती अन्य मतदारसंघात अधिकच गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपने आणि शिवसेनेने आपापल्या पक्षामध्ये बड्या राजकीय नेत्यांची भरती करून घेतली होती. त्यामुळे अन्य पक्षातून आलेल्यांसाठी भाजपसह शिवसेनेने रेडकार्पेट टाकले होते. अन्य पक्षातून आलेल्यांना निवडणुकीत संधी दिली जात असल्याने दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवार नाराज झाले. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केले नाहीत, असे सांगितले गेले. मात्र, बंडाचे निशाण हे फडकवले गेलेच. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात आला तीच परिस्थीत रायगड जिल्ह्यातही दिसून येते.अलिबाग, श्रीवर्धन, महाड, उरण आणि कर्जत या जागा शिवसेनेच्या तर पनवेल आणि पेणच्या जागेवर भाजप आपले उमेदवार उतरवणार असे सूत्र होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होताच प्रथम उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवले आहे, त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. महेश बालदी यांनी सुरुवातीपासूनच भाजपची उमेदवारी आपल्याच मिळणार अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. भाजपनेही त्यांना, कामाला लागा, असे सांगितले होते.उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विरोधात महेश बालदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसनेने पेण विधानसभा मतदारसंघामध्ये नरेश गावंड यांना मैदानात उतरवले आहे. पेणमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांना एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितल्याचे नरेश गावंड यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करा, असे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास टावरी यांनीही तशाच सूचना दिल्या असल्याचे नरेश गावंड यांनी बुधवारी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हेसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याही अडचणींत वाढ होणार आहे.दबावतंत्राच्या वापराची चर्चाअशीच परिस्थिती राहिल्यास श्रीवर्धन, महाड, कर्जत, पनवेल या ठिकाणीसुद्धा युतीमधीलच उमेदवार उभे राहून आव्हान देऊ शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे.त्यामुळे पुढील दोन दिवस कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोणत्या सेटलमेंटवर बंडखोरी करणारे शांत बसणार हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019RaigadरायगडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा