शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

रायगड जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 03:12 IST

उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : उमेदवारीची आस लावून बसलेल्यांना विधानसभेचे तिकीट पक्के न झाल्याने त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या युतीला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. सध्या उरण आणि पेण याच मतदारसंघामध्ये या ग्रहणाची छाया पडली असली, तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती अन्य मतदारसंघात अधिकच गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.निवडणुकीच्या काही महिने आधी भाजपने आणि शिवसेनेने आपापल्या पक्षामध्ये बड्या राजकीय नेत्यांची भरती करून घेतली होती. त्यामुळे अन्य पक्षातून आलेल्यांसाठी भाजपसह शिवसेनेने रेडकार्पेट टाकले होते. अन्य पक्षातून आलेल्यांना निवडणुकीत संधी दिली जात असल्याने दोन्ही पक्षांतील संभाव्य उमेदवार नाराज झाले. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केले नाहीत, असे सांगितले गेले. मात्र, बंडाचे निशाण हे फडकवले गेलेच. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात आला तीच परिस्थीत रायगड जिल्ह्यातही दिसून येते.अलिबाग, श्रीवर्धन, महाड, उरण आणि कर्जत या जागा शिवसेनेच्या तर पनवेल आणि पेणच्या जागेवर भाजप आपले उमेदवार उतरवणार असे सूत्र होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होताच प्रथम उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवले आहे, त्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. महेश बालदी यांनी सुरुवातीपासूनच भाजपची उमेदवारी आपल्याच मिळणार अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. भाजपनेही त्यांना, कामाला लागा, असे सांगितले होते.उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विरोधात महेश बालदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसनेने पेण विधानसभा मतदारसंघामध्ये नरेश गावंड यांना मैदानात उतरवले आहे. पेणमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांना एक प्रकारे आव्हान दिल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितल्याचे नरेश गावंड यांनी स्पष्ट केले. मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करा, असे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास टावरी यांनीही तशाच सूचना दिल्या असल्याचे नरेश गावंड यांनी बुधवारी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते हेसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याही अडचणींत वाढ होणार आहे.दबावतंत्राच्या वापराची चर्चाअशीच परिस्थिती राहिल्यास श्रीवर्धन, महाड, कर्जत, पनवेल या ठिकाणीसुद्धा युतीमधीलच उमेदवार उभे राहून आव्हान देऊ शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे.त्यामुळे पुढील दोन दिवस कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोणत्या सेटलमेंटवर बंडखोरी करणारे शांत बसणार हे लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019RaigadरायगडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा